शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

जिल्हा प्रथम क्रमांकावर आणणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारच्या आंकाक्षित जिल्हा उपक्रमाअंतर्गत ३४ व्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर मजल मारण्यासाठी जून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारच्या आंकाक्षित जिल्हा उपक्रमाअंतर्गत ३४ व्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर मजल मारण्यासाठी जून २०२० ही डेडलाईन ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.नंदुरबार जिल्हा हा केंद्र शासनाने आकांक्षित जिल्हा म्हणून निवडला आहे. गेल्या वेळी देशातील एकुण जिल्ह्यांमध्ये नंदुरबार ३४ व्या क्रमांकावर होता. आता जिल्हा पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, वसुमना पंत आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, अंगणवाडीत पोषण आहार नियमितपणे दिला जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. अमृत आहार योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंगणवाडीबाहेर माहिती फलक लावावेत. गर्भवती महिलांना पोषण आहाराचे महत्व कळावे यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या अधिकाराविषयी जाणीव करून द्यावी. अंगणवाडी दुरुस्ती आणि बालकांना गणवेशाची कामे सीएसआर निधीतून करण्यात यावी.पशू लसीकरण वेळेवर करण्यात यावे. कृषी विषयक योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी. मोलगी व धडगावमध्ये बँक शाखा उघडण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी प्रयत्न करावे. ग्रामपंचायतीत सर्व सेवा जूनपर्यंत आॅनलाईन करण्याचे प्रयत्न करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.दहावीच्या परिक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे व कॉपी प्रकारांना मदत करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी कॉपीसारखे प्रकार रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध मानकांचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम केल्यास जिल्हा वरच्या क्रमांकावर पोहचेल असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला.

आकांक्षित जिल्हा अंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले जात आहेत. त्यांना गती देण्यासाठी मात्र अपेक्षीत प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या बाबी मनावर घेवून संबधीत विभागांना सक्रीय करण्यासाठी गुरुवारची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे म्हणने देखील ऐकूण घेत त्यावर उपाय सुचविले. आता कामाला गतीची अपेक्षा आहे.