शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: March 2, 2017 23:08 IST

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे.

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे. इमारत आवारात पिण्याचे पाणी नसल्यामुळे जवळपास सर्वच विभागांना पाण्याचे जार लावावे लागले आहेत. विशेष म्हणजे कामे घेऊन येणाºया नागरिकांना तर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.  तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी देऊनही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीत सर्वच सेवा अत्याधुनिक स्वरूपाच्या आहेत. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचा खर्च कमी करण्यासाठी वायफायदेखील सुरू केले. पेपरलेस कारभाराबाबत जिल्हा परिषद आघाडीवर आहे. असे असताना इमारतीत पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात कर्मचाºयांना आणि कामे घेऊन येणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.कूपनलिका व विहीरजिल्हा परिषदेची पाण्याची गरज पुरविण्यासाठी आवारात कूपनलिका व विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात त्यांच्या पाण्याची पातळी खोल जाते. इमारत असलेला परिसर हा खडकाळ भागाचा व खदाणीचा आहे. त्यामुळे या भागात हजार फुटापर्यंतदेखील पुरेसे पाणी लागत नसल्याची स्थिती आहे. या दोन कूपनलिकांद्वारे परिसरात आणि कर्मचारी वसाहतींमध्ये पाणी पुरविण्यात येते. सध्या दोन्ही कूपनलिकांची पाणी पातळी खोल गेलेली आहे. पिण्यालायक नाहीयेथे असलेल्या कूपनलिकांचे पाणी पिण्यालायक नसल्याचा अहवाल यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे हे पाणी कर्मचारी पित नाहीत. परिणामी कुणी घरून पाणी आणतो, तर काही विभागांनी विकत पाण्याचे जार लावले आहेत. आर.ओ. वॉटर फिल्टर पदाधिकाºयांच्या आणि दोन अधिकाºयांच्या दालनात लावण्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी इतर कुणालाही पाणी घेऊ दिले जात नसल्याची स्थिती आहे. आर.ओ. सिस्टिम खराबया ठिकाणी असलेली आर.ओ. सिस्टिम गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. कूपनलिका, विहीर आणि पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या कनेक्शनमधून पाणी इमारतीच्या वर असलेल्या टाकीमध्ये जाते. तेथून निघणारे पाणी आर.ओ.सिस्टिमद्वारे दुसºया टाकीत गेल्यानंतर ते इमारतीत इतरत्र पुरविण्यात येते. परंतु ही यंत्रणाच ठप्प पडली आहे.अभ्यागतांनाही त्रासजिल्हा परिषदेत विविध कामे घेऊन येणाºया अभ्यागतांनादेखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. कुणाकडे पाणी मागितल्यास सरळ नकार दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका सार्वजनिक नळावर अभ्यागतांना तहान भागवावी लागते.या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील हॉटेल आणि टपरीवर पाण्याच्या बाटल्यांची विक्री वाढली आहे. परिणामी अवाच्या सवा     भावात त्यांची विक्री करण्यात येत आहे.पालिकेकडून जोडणीपालिकेची शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन याच परिसरातून गेली आहे. पालिकेकडे यापूर्वी पाणी मागणीसाठी जिल्हा परिषदेने अर्ज केला होता. त्यानुसार मीटर पद्धतीने पाणी देण्यात आले आहे. कर्मचारी वसाहतीतही समस्याजिल्हा परिषद इमारतीला लागूनच असलेल्या कर्मचारी वसाहतीतदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या वसाहतीतदेखील अनेक कर्मचारी पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घेत आहेत. आता उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावणार आहेत. त्यामुळे पालिकेने आतापासूनच उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.अध्यक्षांनीच घेतली स्वत: दखलजिल्हा परिषद इमारतीमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतदेखील स्वत: अध्यक्षा रजनी नाईक यांनी संबंधित अधिकाºयांना विचारणा केली होती. काही लोकांनी आणि कर्मचाºयांनी थेट अध्यक्षांकडेच याबाबत ग्राºहाणे मांडले होते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असताना ती झालेली नसल्याचे दिसून येते. वास्तविक गेल्या वर्षी अभ्यागतांसाठी इमारतीच्या मधल्या आवारात आर.ओ. बसविण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु ते बसविले गेले नाही. याउलट सर्वच पदाधिकाºयांच्या दालनात ते बसविण्यात आले.