शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

जिल्हा परिषदेतच पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: March 2, 2017 23:08 IST

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे.

नंदुरबार : संपूर्ण जिल्हाभरातील पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना करणाºया जिल्हा परिषदेचाच घसा कोरडा पडल्याचे चित्र आहे. इमारत आवारात पिण्याचे पाणी नसल्यामुळे जवळपास सर्वच विभागांना पाण्याचे जार लावावे लागले आहेत. विशेष म्हणजे कामे घेऊन येणाºया नागरिकांना तर पाण्यासाठी भटकंती करावी लागते.  तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षांनी देऊनही उपयोग झाला नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या इमारतीत सर्वच सेवा अत्याधुनिक स्वरूपाच्या आहेत. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचा खर्च कमी करण्यासाठी वायफायदेखील सुरू केले. पेपरलेस कारभाराबाबत जिल्हा परिषद आघाडीवर आहे. असे असताना इमारतीत पिण्याच्या पाण्याची सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात कर्मचाºयांना आणि कामे घेऊन येणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.कूपनलिका व विहीरजिल्हा परिषदेची पाण्याची गरज पुरविण्यासाठी आवारात कूपनलिका व विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात त्यांच्या पाण्याची पातळी खोल जाते. इमारत असलेला परिसर हा खडकाळ भागाचा व खदाणीचा आहे. त्यामुळे या भागात हजार फुटापर्यंतदेखील पुरेसे पाणी लागत नसल्याची स्थिती आहे. या दोन कूपनलिकांद्वारे परिसरात आणि कर्मचारी वसाहतींमध्ये पाणी पुरविण्यात येते. सध्या दोन्ही कूपनलिकांची पाणी पातळी खोल गेलेली आहे. पिण्यालायक नाहीयेथे असलेल्या कूपनलिकांचे पाणी पिण्यालायक नसल्याचा अहवाल यापूर्वीच देण्यात आला आहे. त्यामुळे हे पाणी कर्मचारी पित नाहीत. परिणामी कुणी घरून पाणी आणतो, तर काही विभागांनी विकत पाण्याचे जार लावले आहेत. आर.ओ. वॉटर फिल्टर पदाधिकाºयांच्या आणि दोन अधिकाºयांच्या दालनात लावण्यात आलेले आहेत. परंतु त्या ठिकाणी इतर कुणालाही पाणी घेऊ दिले जात नसल्याची स्थिती आहे. आर.ओ. सिस्टिम खराबया ठिकाणी असलेली आर.ओ. सिस्टिम गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाली आहे. कूपनलिका, विहीर आणि पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या कनेक्शनमधून पाणी इमारतीच्या वर असलेल्या टाकीमध्ये जाते. तेथून निघणारे पाणी आर.ओ.सिस्टिमद्वारे दुसºया टाकीत गेल्यानंतर ते इमारतीत इतरत्र पुरविण्यात येते. परंतु ही यंत्रणाच ठप्प पडली आहे.अभ्यागतांनाही त्रासजिल्हा परिषदेत विविध कामे घेऊन येणाºया अभ्यागतांनादेखील पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते. कुणाकडे पाणी मागितल्यास सरळ नकार दिला जातो. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका सार्वजनिक नळावर अभ्यागतांना तहान भागवावी लागते.या सर्व परिस्थितीमुळे परिसरातील हॉटेल आणि टपरीवर पाण्याच्या बाटल्यांची विक्री वाढली आहे. परिणामी अवाच्या सवा     भावात त्यांची विक्री करण्यात येत आहे.पालिकेकडून जोडणीपालिकेची शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन याच परिसरातून गेली आहे. पालिकेकडे यापूर्वी पाणी मागणीसाठी जिल्हा परिषदेने अर्ज केला होता. त्यानुसार मीटर पद्धतीने पाणी देण्यात आले आहे. कर्मचारी वसाहतीतही समस्याजिल्हा परिषद इमारतीला लागूनच असलेल्या कर्मचारी वसाहतीतदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. या वसाहतीतदेखील अनेक कर्मचारी पिण्याच्या पाण्यासाठी जार विकत घेत आहेत. आता उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावणार आहेत. त्यामुळे पालिकेने आतापासूनच उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.अध्यक्षांनीच घेतली स्वत: दखलजिल्हा परिषद इमारतीमधील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेतदेखील स्वत: अध्यक्षा रजनी नाईक यांनी संबंधित अधिकाºयांना विचारणा केली होती. काही लोकांनी आणि कर्मचाºयांनी थेट अध्यक्षांकडेच याबाबत ग्राºहाणे मांडले होते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढले. त्यावर उपाययोजना होणे आवश्यक असताना ती झालेली नसल्याचे दिसून येते. वास्तविक गेल्या वर्षी अभ्यागतांसाठी इमारतीच्या मधल्या आवारात आर.ओ. बसविण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु ते बसविले गेले नाही. याउलट सर्वच पदाधिकाºयांच्या दालनात ते बसविण्यात आले.