शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन चाकरमानी ही मोठ्या शहरातून गावाकडे परतत आहेत. नियामानुसार जिल्हा बाहेरील व्यक्ती गावाकडे आली तर त्याला गावातील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून १४ दिवस होमक्वॉरंटाईन व्हावे लागते. परंतु काही नागरिक जिल्हा बाहेरून आल्यानंतरही राजरोसपने बाजारात किंवा बाहेर फिरत आहेत.या बेपर्वाहीमुळेच गेल्या सहा दिवसात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे खेडेगावात व तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिल्या, दुसऱ्या, तिसºया व आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, महसूल,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन जिल्ह्यात समन्वयाने व डोळ्यात तेल घालून काम करत आहे. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या शहरी भागात आणि बामखेडा,आष्टे, नटावद सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रशासन कोरोनामुक्त करण्यास यश मिळाले होते. परंतु नागरिकांच्या बेफिकरिमुळे त्या आनंदावर विरजन पडले. खेडेगावात कोरोनाने आता खरा प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. म्हणून बाहेरगावाहुन व जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्य तपासणी करून १४ दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.