शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन चाकरमानी ही मोठ्या शहरातून गावाकडे परतत आहेत. नियामानुसार जिल्हा बाहेरील व्यक्ती गावाकडे आली तर त्याला गावातील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून १४ दिवस होमक्वॉरंटाईन व्हावे लागते. परंतु काही नागरिक जिल्हा बाहेरून आल्यानंतरही राजरोसपने बाजारात किंवा बाहेर फिरत आहेत.या बेपर्वाहीमुळेच गेल्या सहा दिवसात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे खेडेगावात व तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पहिल्या, दुसऱ्या, तिसºया व आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, महसूल,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन जिल्ह्यात समन्वयाने व डोळ्यात तेल घालून काम करत आहे. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या शहरी भागात आणि बामखेडा,आष्टे, नटावद सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रशासन कोरोनामुक्त करण्यास यश मिळाले होते. परंतु नागरिकांच्या बेफिकरिमुळे त्या आनंदावर विरजन पडले. खेडेगावात कोरोनाने आता खरा प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. म्हणून बाहेरगावाहुन व जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्य तपासणी करून १४ दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.