शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद ...

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद होऊन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. कोरोना काळात शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले होते. यंदाही अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करून नुकसानीची भर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कृषीपंपांची थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला यांसह ऊस, पपई व केळीला पाण्याची सद्यस्थितीत नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात मोठी घट येऊन शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात रब्बी हंगामातील उत्पन्न निघाल्यावरच पैसा येणार आहे. त्यामुळे ते सद्यस्थितीत वीज बिल भरू शकत नाहीत. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून ही मोहीम मागे घ्यावी व कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

कोरोनामुळे शेतकरी परेशान आहे. याचबरोबर दुष्काळात पाणी नाही, पाणी आहे तर वीजपुरवठा खंडित अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने बागायतदार शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शहादा तालुक्यात वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असून, किरकोळ दुरुस्तीसाठी दिवसभर वीजपुरवठा बंद केला जातो. अनेक ठिकाणचे ट्रान्स्फाॅर्मर नादुरुस्त आहेत. लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन रात्रभर ग्रामस्थांना अंधारात रहावे लागते. या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.