शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम समिती बदलाचा वाद अखेर उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीच्या बदलाचा विषय उच्च न्यायालयात गेला आहे. सभापती अभिजीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीच्या बदलाचा विषय उच्च न्यायालयात गेला आहे. सभापती अभिजीत पाटील यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली असून विषय समिती बदलाचा अधिकार सभापतींना नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. अ‍ॅड.चंद्रकांत पाटील यांच्या वतीने त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.जिल्हा परिषदेचे सभापती अभिजीत पाटील यांच्याकडील बांधकाम व अर्थ समिती काढून घेत ती उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्याकडे तर रघुवंशी यांच्याकडील कृषी व पशुसंवर्धन समिती पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाला आक्षेप घेत अभिजीत पाटील यांनी निर्णयाबाबत उच्च न्यायालयात जाण्याचे सुतोवाच केले होते. अखेर त्यांनी अ‍ॅड.चंद्रकांत पाटील यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.याचिकेत म्हटले आहे की, विषय समितीच्या सभापतींची मुदत अडीच वर्षे असून कलम ८३ अन्वये सभापती म्हणून निवड झाल्यावर अडीच वर्षांची मुदत पूर्ण करेपर्यंत कोणताही बदल करता येत नाही. अधिनियमातंर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत एकदा विषय समितीचे सभापती म्हणून निवडल्यानंतर अडीच वर्ष विषय समितीचे अध्यक्ष असतात.अधिनियम कलम १११ सत्तेचा वापर करून अडीच वर्षाच्या मुदतीच्या समाप्तीपूर्वी विषय समितीच्या सभापतीच्या वाटपामध्ये बदल करण्यास जिल्हा परिषदेला अधिकार नाही आणि ती सक्षम नाही. जिल्हा परिषद हे विषय समितीच्या अध्यक्षपदाबाबत सुधारणा किंवा बदल करण्याचे अधिकार नाही. त्यामुळे ३१ जुलैच्या बैठकीत जो बदल झालेला आहे तो रद्द करणे योग्य आहे. तसेच विषय समिती अध्यक्षपदाचा बदल सर्वसाधारण सभेत होऊ शकत नाहीत म्हणून देखील सदर ठराव पास झाला आहे तो रद्द करणे आवश्यक आहे.३१ जुलैच्या बैठकीची नोटीस आवश्यक त्या प्रतीसह जारी करण्यात आलेली नव्हती. सदस्यांची चर्चा करण्यात आलेली आहे ते सुद्धा सदर नोटीसमध्ये नमूद केले नव्हते. अभिजित पाटील यांनी बैठक पुढे ढकलण्याची विंनती नाकारण्यात आली. बैठकीत कोणतीही प्रभावी चर्चा वादविवाद झाले नाहीत. म्हणून बैघकीतील या संदर्भातील झालेले कामकाज नियमाला धरून नसल्याने तो रद्द करावा असेही या याचिकेत नमुद केले आहे.