शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चेतक फेस्टीवलच्या निधीला दानवेंचा आक्षेप का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:15 IST

- रमाकांत पाटील सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला राज्य शासनाने गेल्या वर्षापासून दरवर्षी पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर करून या ...

- रमाकांत पाटीलसारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलला राज्य शासनाने गेल्या वर्षापासून दरवर्षी पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर करून या फेस्टीवलला ‘ग्लोबल’ स्वरुप देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्याच वर्षी मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या अश्व संग्रहालयाच्या कामाची बोंब असताना यंदा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निधी न देण्याची शिफारस शासनाला करणार असल्याचे सांगितले. मुळातच चेतक फेस्टीवल हा जिल्ह्यातील अंतर्गत वादातीत मुद्दा असला तरी या फेस्टीवलमुळे जिल्ह्याचे नाव राज्य आणि देश पातळीवर पोहोचत आहे. शिवाय हा फेस्टीवल झाल्यास यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत किमान महिनाभर अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे निधी अडविण्याच्या भाषेबद्दल जिल्ह्यात नाराजीचा सूर आहे.नंदुरबार जिल्हा मुळातच राज्यात मागास जिल्ह्यांच्या यादीत आहे. वास्तविक या जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा वैभवशाली असताना त्याच्या श्रीमंतीचा गाजावाजा न होता केवळ जिल्ह्यातील उपेक्षित बाबींची चर्चा होऊन जिल्ह्यातील जनतेची मानसिकतेत न्यूनगंडता आणण्याचा प्रयत्न होत आहे. या पाश्र्वभूमीवर किमान सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताची यात्रा व त्यानिमित्ताने भरणा:या घोडे बाजाराला चालना मिळून चेतक फेस्टीवलची सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी या फेस्टीवलला ब:यापैकी प्रतिसाद मिळाला. त्याच्या जाहिरातीही राज्यात व देशात झळकल्याने यंदा अजून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या फेस्टीवलमुळे केवळ शासनाचा पैसा वाया जात असल्याचाही सूर व्यक्त करणारा एक गट आहे. परंतु सरकारतर्फे दरवर्षी राज्यात अनेक ठिकाणी असे फेस्टीवल व कार्यक्रम घेतले जातात. त्यावर कोटय़ावधींची उधळण होते. या पाश्र्वभूमीवर किमान सारंगखेडय़ाच्या चेतक फेस्टीवलमुळे अनेकांना रोजगार मिळाला. जिल्ह्याचे मागासपण त्यातून काहीअंशी तरी दूर होण्यास मदत झाली, जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना चालना मिळाली, यात्रेचे वैभव  वाढले, लोकांनी पर्यटन विभागाने केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष लाभ घेतला नसला तरी ते पाहून किमान डोळ्याचे पारणे फेडले. या यात्रेत अनेकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. अशा कितीतरी जमेच्या बाजू नाकारता येणार नाहीत. या पाश्र्वभूमीवर रविवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने चेतक फेस्टीवलचा निधी देऊ नये, असे सरकारला शिफारस करणार असल्याचे सांगून हा फेस्टीवल लोकसहभागातून करण्याचा सल्ला दिला. मुळातच दुष्काळी स्थिती असल्याने लोकसहभागातून दुष्काळ निवारणाची कामे करण्याचा सल्ला देण्याऐवजी त्यांनी फेस्टीवल करण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे या फेस्टीवलसाठी सरकारला पैसे देऊ नये, अशी शिफारस करण्याचेही सांगितले. एकूणच विरोधाभास करणारे विधान त्यांनी केले. फेस्टीवलच्या निधीतून काय करावे याबाबत स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. तो निधी नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाच्या इतर कामांना देणार की इतर जिल्ह्यांना देणार याबाबतचेही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. खरे तर दुष्काळी परिस्थितीमुळे फेस्टीवल झाल्यास किमान महिना-दीड महिना अनेकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न आतापासूनच गंभीर झाला आहे. चेतक फेस्टीवलच्या नावाने या भागातील पर्यटनाची चर्चा आताशी सुरू झाली. या जिल्ह्यात तोरणमाळ, प्रकाशा, डाब, अस्तंबा आदी ठिकाणी पर्यटन विकासातून करण्यासारखी कितीतरी कामे आहेत. अनेकवेळा केवळ प्रस्ताव झाले पण ते धूळखात पडून आहेत. जर जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला तर या जिल्ह्यातील मागासपण आपोआपच दूर होणार आहे. रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. पण त्याबाबत विचार न होता सुरू असलेला फेस्टीवल बंद करण्याची एकप्रकारे सरकारची मानसिकता असल्याची भाषा भाजपाचे प्रदेश अध्यक्ष करीत आहेत. त्यामुळे जनमानसात नाराजीचा सूर आहे.दुसरीकडे चेतक फेस्टीवल आयोजन करणा:या पदाधिका:यांनीही सरकारच्या निधीचा पुरेपूर लोकांसाठी व या भागाच्या विकासासाठी कामाला येईल, याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी झालेल्या कार्यक्रमाने जिल्ह्यातून संमिश्र सूर व्यक्त होत        आहे. त्या लोकभावनांचा आदर करून यंदा नियोजनातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. नव्हे तर केवळ चेतक फेस्टीवल नाही तर त्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पर्यटन क्षेत्रांकडे लक्ष कसे वेधले जाईल व तेथील पर्यटनाला कसा वाव मिळेल याबाबतही लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. तरच ख:या अर्थाने फेस्टीवलचा हेतूही साध्य होईल.