शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

जयनगर गावाबाहेरून मध्यप्रदेशकडे जाणारा बायपास रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या ...

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. बायपास रस्ता खराब झाल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने जयनगर गावातून जात असतात. सर्व वाहने जयनगर गावातून तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. हा रस्ता नवीनच असल्यामुळे वाहनधारक खूप वेगाने आपले वाहन चालवीत असतात. त्यामुळे येथे बऱ्याचदा अपघातही झाले आहेत. मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी शिरपूरकडून येणारी वाहने शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असतात. मग यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने असतील अथवा अवजड वाहने ही बायपास रस्ता अतिशय खराब असल्यामुळे जयनगर गावातून जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. गेल्या वर्षी हा बायपास रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, हा रस्ता पुन्हा खराब झाला असून, या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

शिरपूर तालुक्यातील अनेक गावे तसेच शहादा तालुक्यातील तोरखेडा, बामखेडा, वडाळी, कुकावल, कोठली, बोराळे, फेस या गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करीत असतात. या परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने अथवा ट्रकच्या साह्याने आपला ऊस मध्यप्रदेश येथील पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. हे वाहनधारक शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असल्यामुळे जयनगर, लोंढरे असलोद - मंदाणेमार्गे आपला ऊस पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. मे महिन्यात ऊस निघाल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाहनांची वर्दळ जयनगरमार्गे चालूच असते. वाहनधारक ही जयनगर गावाच्या बाहेरील दत्त मंदिर ते भवानी मातेच्या मंदिरादरम्यान तयार करण्यात आलेला बायपास रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्याचा वापर करण्याऐवजी जयनगर गावामधून तयार करण्यात आलेला नवीन काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. गावातील काँक्रीट रस्त्यावर लहान मुले तसेच ग्रामस्थांची ये-जा चालूच असते. त्यामुळे छोटे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गावातून मोठी वाहने गेल्यावर समोरून मोठे वाहन आल्यास क्रॉसिंग करण्याच्या वेळेस वाहनचालकांना खूप कसरत करावी लागते. तसेच उसाच्या ट्रॅक्टरमुळे जयनगर गावातील विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे असे प्रकार बऱ्याचदा झाले आहेत.

जयनगर गावातून वाहने जात असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांना खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, वाहनधारक खूप वेगाने वाहन घेऊन जात असल्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला अपघात होऊ नये, म्हणून मुलांकडे नेहमी लक्ष द्यावे लागत असते. हा सगळा त्रास पाहता जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करायला हवा, अशी मागणी महात्मा फुले युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने या रस्त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे ही वाहने जयनगर गावामधील काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. वेगाने वाहन चालविल्यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघातही झाले आहेत. म्हणून भविष्यात मोठा अपघात होऊ नये, म्हणून बायपास रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.

- ईश्वर माळी, संस्थापक अध्यक्ष- महात्मा फुले युवा मंच