शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जयनगर गावाबाहेरून मध्यप्रदेशकडे जाणारा बायपास रस्ता दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या ...

गेल्या दहा ते बारा वर्षांपूर्वी जयनगर गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता अतिशय खराब झाला असून, या रस्त्याची पूर्ण चाळण झाली आहे. बायपास रस्ता खराब झाल्यामुळे मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने जयनगर गावातून जात असतात. सर्व वाहने जयनगर गावातून तयार करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. हा रस्ता नवीनच असल्यामुळे वाहनधारक खूप वेगाने आपले वाहन चालवीत असतात. त्यामुळे येथे बऱ्याचदा अपघातही झाले आहेत. मध्यप्रदेशकडे जाण्यासाठी शिरपूरकडून येणारी वाहने शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असतात. मग यामध्ये दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहने असतील अथवा अवजड वाहने ही बायपास रस्ता अतिशय खराब असल्यामुळे जयनगर गावातून जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याचा वापर करीत आहेत. गेल्या वर्षी हा बायपास रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, हा रस्ता पुन्हा खराब झाला असून, या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

शिरपूर तालुक्यातील अनेक गावे तसेच शहादा तालुक्यातील तोरखेडा, बामखेडा, वडाळी, कुकावल, कोठली, बोराळे, फेस या गावांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करीत असतात. या परिसरातील शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने अथवा ट्रकच्या साह्याने आपला ऊस मध्यप्रदेश येथील पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. हे वाहनधारक शहादामार्गे न जाता जयनगरमार्गे जात असल्यामुळे जयनगर, लोंढरे असलोद - मंदाणेमार्गे आपला ऊस पानसेमलजवळील दुर्गा खानसरी येथे घेऊन जात असतात. मे महिन्यात ऊस निघाल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाहनांची वर्दळ जयनगरमार्गे चालूच असते. वाहनधारक ही जयनगर गावाच्या बाहेरील दत्त मंदिर ते भवानी मातेच्या मंदिरादरम्यान तयार करण्यात आलेला बायपास रस्ता खराब असल्यामुळे या रस्त्याचा वापर करण्याऐवजी जयनगर गावामधून तयार करण्यात आलेला नवीन काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. गावातील काँक्रीट रस्त्यावर लहान मुले तसेच ग्रामस्थांची ये-जा चालूच असते. त्यामुळे छोटे अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गावातून मोठी वाहने गेल्यावर समोरून मोठे वाहन आल्यास क्रॉसिंग करण्याच्या वेळेस वाहनचालकांना खूप कसरत करावी लागते. तसेच उसाच्या ट्रॅक्टरमुळे जयनगर गावातील विजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे असे प्रकार बऱ्याचदा झाले आहेत.

जयनगर गावातून वाहने जात असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांना खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, वाहनधारक खूप वेगाने वाहन घेऊन जात असल्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला अपघात होऊ नये, म्हणून मुलांकडे नेहमी लक्ष द्यावे लागत असते. हा सगळा त्रास पाहता जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेला बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन त्वरित दुरुस्त करायला हवा, अशी मागणी महात्मा फुले युवा मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

जयनगर गावाच्या बाहेरून तयार करण्यात आलेल्या बायपास रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, मध्यप्रदेशकडे जाणारी वाहने या रस्त्याचा वापर करीत नाहीत. त्यामुळे ही वाहने जयनगर गावामधील काँक्रीट रस्त्याचा वापर करीत असतात. वेगाने वाहन चालविल्यामुळे या रस्त्यावर अनेकदा अपघातही झाले आहेत. म्हणून भविष्यात मोठा अपघात होऊ नये, म्हणून बायपास रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा.

- ईश्वर माळी, संस्थापक अध्यक्ष- महात्मा फुले युवा मंच