शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा शहरात स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर ...

हातपंप लावण्यासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा

धडगाव : तालुक्यातील १५० च्या जवळपास पाड्यांवर यंदा पाणीटंचाई राहणार असल्याची शक्यता आहे. यामुळे पाड्यांवर हातपंप नव्याने लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जुनाट हातपंप दुरुस्त होणे शक्य नसल्याने जिल्हा परिषदेने नवीन हातपंप देण्याची गरज आहे.

हायमास्टचा प्रश्न मार्गी लावा

धडगाव : तालुक्याच्या दुर्गम व अति दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये हायमास्ट आणि पथदिवे नादुरुस्त झाले आहेत. संबंधित ठेकेदाराने मंजूर केल्यानंतर सहा महिनेही हे पथदिवे व हायमास्ट पूर्ण क्षमतेने चालू शकले नाहीत, यामुळे त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा नवीन हायमास्ट लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोग्य केेंद्राच्या आवारातील अंधारामुळे सर्पदंशाची भीती आहे.

कोरडी झाडे जैसे थे

नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान कोरड्या झाडांचा प्रश्न कायम आहे. ही झाडे कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यापूर्वी या झाडांना आगी लावून ती कोरडी करण्यात आली आहेत. ही झाडे प्रशासनाने काढून त्याजागी वृक्षारोपण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लांडग्यांची झुंड

नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागातील न्याहली ते कोपर्लीपर्यंतच्या वनक्षेत्रातील टेकड्यांवर लांडग्यांचा झुंड फिरताना दिसून येत आहे. या भागात अनेकांची शेती असून शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. याबाबत वनविभागानेही शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.

मिरची पथारींवरील कामे अंतिम टप्प्यात

नंदुरबार : मिरची खरेदी-विक्रीचा हंगाम आटोपता झाला असून शहरातील मिरची पथारींवर व्यापाऱ्यांकडून अंतिम टप्प्यांची कामे सुरू आहेत. सुकवलेली मिरची कारखान्यांमध्ये पाठवण्यासह इतर कामांना सध्या गती देण्यात येत आहे. यंदा मिरची उत्पादन चांगले असले तरी रोग व इतर कारणांमुळे पथारीवर आवक कमी राहिली होती. यातून दर काहीअंशी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाण्याचा वापर व्हावा

नंदुरबार : तालुक्यातील धरणे व गावतलावांमध्ये अद्यापही मुबलक पाणीसाठा आहे. या पाण्याचा वापर शेतीसाठी व्हावा यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने धरणातील पाणी द्यावे यासाठी शेतकरी त्या कार्यालयांमध्ये चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.

टरबुजांची आवक

नंदुरबार : ऊन वाढू लागताच बाजारानेही कूस बदलली असून उन्हाळी टरबूज दाखल होऊ लागले आहेत. तालुक्यातील विविध भागात लागवड करून उत्पादित करण्यात आलेल्या या गोड टरबुजांना मागणी आहे. व्यापारी शेतबांधावर जाऊन टरबुजांची खरेदी करत असल्याची माहिती आहे.