शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत आहे़ सतत बदलणाऱ्या आकडेवारीमुळे समाजमन अस्वस्थ आहे़ परंतु दुसरीकडे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर माहिती देणाºया शासनाच्या वेबसाईट्सवरचे आकडे भ्रमित करणारे असल्याचे समोर आले आहे़नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता़ यानंतर जून ते जुलै या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहिली आहे़ एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात आकडेवारी ही साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे़ यात १११ जणांचा मृत्यू तर तीन हजार नागरिकांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे़ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत दररोज आकडेवारी प्रसारित करुन माहिती देण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी समोर येणाºया रुग्णांची माहिती ही सोशल मिडियातून वेळोवेळी प्रसारित करुन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे़ ही बाब चांगली असली तरीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मयत यांची संख्या ही जिल्ह्यातील नियमित संख्येपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे़ह्या सर्व वेबसाईट्स केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे आहेत़ असे असतानाही आकड्यांमध्ये नियमित तफावत जिल्ह्याबाहेर राहून माहिती घेणाºया जिल्ह्यातील मूळ रहिवाशांची चिंता वाढवणारी ठरत आहे़ यात सुधार करणे करण्याची अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती़ परंतू आकडेवारीत सुधारणा झालेली नाही़४नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ही ४ हजार ५७२ एवढी दिसत होती़ याचवेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ही संख्या ४ हजार ६७२ एवढी दिसत होती़ जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत मयतांची संख्या ही १०८ होती़ सोमवारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही आकडेवारी १११ झाली़ परंतू रविवारी दुपारपासून सर्व संकेतस्थळावर १११ हीच संख्या पुढे चालवण्यात येत होती़ केंद्र शासनाच्या एका ट्रॅकिंग अ‍ॅपवर नंदुरबार जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही १ हजार १९० दिसत आहे़ प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २६७ एवढी असल्याचे समोर आले होते़ ही माहिती नागरिक शेअर करत असल्याने आकड्यांची तफावत संभ्रम निर्माण करते़एकीकडे दाखल आणि मयतांच्या आकडेवारीचा गोंधळ असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे़ जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ३२२ जणांना सोडून देण्यात आले आहे़ परंतु केंद्राच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी ३ हजार ३७१ एवढी दिसत आहे़ तब्बल १९१ रुग्णांच्या संख्येबाबत हा गोंधळ आहे़सोशल मिडियासोबत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर स्थानिक नागरिक माहिती घेऊन पडताळणी करत आहेत़ रुग्ण संख्या कमी अधिक दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज वाढून भितीही वाढत आहे़