शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत आहे़ सतत बदलणाऱ्या आकडेवारीमुळे समाजमन अस्वस्थ आहे़ परंतु दुसरीकडे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर माहिती देणाºया शासनाच्या वेबसाईट्सवरचे आकडे भ्रमित करणारे असल्याचे समोर आले आहे़नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता़ यानंतर जून ते जुलै या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहिली आहे़ एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात आकडेवारी ही साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे़ यात १११ जणांचा मृत्यू तर तीन हजार नागरिकांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे़ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत दररोज आकडेवारी प्रसारित करुन माहिती देण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी समोर येणाºया रुग्णांची माहिती ही सोशल मिडियातून वेळोवेळी प्रसारित करुन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे़ ही बाब चांगली असली तरीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मयत यांची संख्या ही जिल्ह्यातील नियमित संख्येपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे़ह्या सर्व वेबसाईट्स केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे आहेत़ असे असतानाही आकड्यांमध्ये नियमित तफावत जिल्ह्याबाहेर राहून माहिती घेणाºया जिल्ह्यातील मूळ रहिवाशांची चिंता वाढवणारी ठरत आहे़ यात सुधार करणे करण्याची अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती़ परंतू आकडेवारीत सुधारणा झालेली नाही़४नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ही ४ हजार ५७२ एवढी दिसत होती़ याचवेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ही संख्या ४ हजार ६७२ एवढी दिसत होती़ जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत मयतांची संख्या ही १०८ होती़ सोमवारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही आकडेवारी १११ झाली़ परंतू रविवारी दुपारपासून सर्व संकेतस्थळावर १११ हीच संख्या पुढे चालवण्यात येत होती़ केंद्र शासनाच्या एका ट्रॅकिंग अ‍ॅपवर नंदुरबार जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही १ हजार १९० दिसत आहे़ प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २६७ एवढी असल्याचे समोर आले होते़ ही माहिती नागरिक शेअर करत असल्याने आकड्यांची तफावत संभ्रम निर्माण करते़एकीकडे दाखल आणि मयतांच्या आकडेवारीचा गोंधळ असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे़ जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ३२२ जणांना सोडून देण्यात आले आहे़ परंतु केंद्राच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी ३ हजार ३७१ एवढी दिसत आहे़ तब्बल १९१ रुग्णांच्या संख्येबाबत हा गोंधळ आहे़सोशल मिडियासोबत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर स्थानिक नागरिक माहिती घेऊन पडताळणी करत आहेत़ रुग्ण संख्या कमी अधिक दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज वाढून भितीही वाढत आहे़