शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

माहितीच्या जाळात कोरोनाचे आकडे खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जगासोबत देश, राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित समोर येण्यापूर्वी त्यांची आकडेवारी समाज माध्यमातून जगासमोर येत आहे़ सतत बदलणाऱ्या आकडेवारीमुळे समाजमन अस्वस्थ आहे़ परंतु दुसरीकडे केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर माहिती देणाºया शासनाच्या वेबसाईट्सवरचे आकडे भ्रमित करणारे असल्याचे समोर आले आहे़नंदुरबार जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता़ यानंतर जून ते जुलै या काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढती राहिली आहे़ एप्रिल ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात आकडेवारी ही साडेचार हजाराच्या घरात पोहोचली आहे़ यात १११ जणांचा मृत्यू तर तीन हजार नागरिकांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे़ जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत दररोज आकडेवारी प्रसारित करुन माहिती देण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी समोर येणाºया रुग्णांची माहिती ही सोशल मिडियातून वेळोवेळी प्रसारित करुन नागरिकांना माहिती देण्यात येत आहे़ ही बाब चांगली असली तरीही महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र जिल्ह्यात कोरोनाबाधित आणि मयत यांची संख्या ही जिल्ह्यातील नियमित संख्येपेक्षा अधिकच असल्याचे समोर येत आहे़ह्या सर्व वेबसाईट्स केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याचे आहेत़ असे असतानाही आकड्यांमध्ये नियमित तफावत जिल्ह्याबाहेर राहून माहिती घेणाºया जिल्ह्यातील मूळ रहिवाशांची चिंता वाढवणारी ठरत आहे़ यात सुधार करणे करण्याची अपेक्षाही त्यांनी यापूर्वी व्यक्त केली होती़ परंतू आकडेवारीत सुधारणा झालेली नाही़४नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवार दुपारी जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या ही ४ हजार ५७२ एवढी दिसत होती़ याचवेळी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ही संख्या ४ हजार ६७२ एवढी दिसत होती़ जिल्ह्यात सोमवारी दुपारपर्यंत मयतांची संख्या ही १०८ होती़ सोमवारी तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही आकडेवारी १११ झाली़ परंतू रविवारी दुपारपासून सर्व संकेतस्थळावर १११ हीच संख्या पुढे चालवण्यात येत होती़ केंद्र शासनाच्या एका ट्रॅकिंग अ‍ॅपवर नंदुरबार जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह पेशंटची संख्या ही १ हजार १९० दिसत आहे़ प्रत्यक्षात ही संख्या १ हजार २६७ एवढी असल्याचे समोर आले होते़ ही माहिती नागरिक शेअर करत असल्याने आकड्यांची तफावत संभ्रम निर्माण करते़एकीकडे दाखल आणि मयतांच्या आकडेवारीचा गोंधळ असताना दुसरीकडे बरे झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे़ जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ३ हजार ३२२ जणांना सोडून देण्यात आले आहे़ परंतु केंद्राच्या संकेतस्थळावर ही आकडेवारी ३ हजार ३७१ एवढी दिसत आहे़ तब्बल १९१ रुग्णांच्या संख्येबाबत हा गोंधळ आहे़सोशल मिडियासोबत केंद्र आणि राज्य सरकारने काढलेल्या अ‍ॅप आणि संकेतस्थळावर स्थानिक नागरिक माहिती घेऊन पडताळणी करत आहेत़ रुग्ण संख्या कमी अधिक दिसत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गैरसमज वाढून भितीही वाढत आहे़