शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करा- प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

निवेदनात, तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ऑगस्ट ...

निवेदनात, तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ऑगस्ट पंधरवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यातील कोरडवाहू व बागायतदार शेतकरी धास्तावले असून रब्बीची नगदी पिके घेणा-या शेतकऱ्यांच्या दोन वेळा पेरण्या झाल्या आहेत. तरीही, शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिलेली नाही.

तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे यंदा तरी प्रशासनाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावेत. प्रकाशा व सारंगखेडा येथे तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे पाणी गेल्या पंधरा वर्षांपासून तसेच साठवून ठेवण्यात आले आहे. हे पाणी शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. युद्धपातळीवर प्रशासनाने कारवाई सुरू करावी. दुष्काळी परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ हाती घेऊन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व शेतमजूर यांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे.

येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे योगेश नामदेव पाटील, अमोल किशोर पाटील, अंबर तेजू भिल, श्यामा दामा ठेलारी आदी उपस्थित होते.