शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करा- प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST

निवेदनात, तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ऑगस्ट ...

निवेदनात, तालुक्यात यावर्षी पर्जन्यमान वीस टक्क्यांपेक्षा कमी झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे. ऑगस्ट पंधरवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे नंदुरबार तालुक्यातील कोरडवाहू व बागायतदार शेतकरी धास्तावले असून रब्बीची नगदी पिके घेणा-या शेतकऱ्यांच्या दोन वेळा पेरण्या झाल्या आहेत. तरीही, शासनाने शेतकऱ्यांना कुठलीही मदत दिलेली नाही.

तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी उपाययोजना गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे यंदा तरी प्रशासनाने तत्काळ पावले उचलून शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावेत. प्रकाशा व सारंगखेडा येथे तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बॅरेजेसचे पाणी गेल्या पंधरा वर्षांपासून तसेच साठवून ठेवण्यात आले आहे. हे पाणी शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. युद्धपातळीवर प्रशासनाने कारवाई सुरू करावी. दुष्काळी परिस्थितीची भीषणता लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ हाती घेऊन शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व शेतमजूर यांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे.

येत्या आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे योगेश नामदेव पाटील, अमोल किशोर पाटील, अंबर तेजू भिल, श्यामा दामा ठेलारी आदी उपस्थित होते.