शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांमधील दांडीबहाद्दरांवर वचक हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

तळोदा शहरातील विविध विभागांतील शासकीय कर्मचारी आपल्या कामाच्या नियोजित वेळेआधीच कार्यालयातून बाहेर पडत असतात. शिवाय अधूनमधून दांड्याही मारत असल्याच्या ...

तळोदा शहरातील विविध विभागांतील शासकीय कर्मचारी आपल्या कामाच्या नियोजित वेळेआधीच कार्यालयातून बाहेर पडत असतात. शिवाय अधूनमधून दांड्याही मारत असल्याच्या तक्रारी जनतेकडून केल्या जात होत्या. याकडे संबंधित विभागप्रमुखांनीही दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप होता. साहजिकच शहाराबरोबरच ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेला आपल्या कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे जनता अक्षरशः वैतागली आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अविशांत पांडा यांनी गेल्या गुरुवारी अचानक तहसील, पंचायत समिती, कृषी, भूमी अभिलेख, जिल्हा परिषद बांधकाम, सिटी सर्व्हे अशा आठ ते नऊ कार्यालयांना भेट देऊन झाडाझडती घेतली होती. त्यात तब्बल २५ कर्मचारी आपआपल्या टेबलावर आढळून आले नाहीत. म्हणजे ते गैरहजर होते. त्यांच्या अचानक भेटीने कर्मचाऱ्यांची एकच भंबेरी उडाली होती. विभागप्रमुखांमार्फत त्यांना आता ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली जाईल. त्यानंतर कुणी रजेवर होते, कुणी प्रमुखांच्या परवानगीने बाहेर मीटिंगला गेले होते, काही साइटवर गेले होते, अशी थातूरमातूर सबब पुढे करून पुढील कारवाईतून सुटका करून घेतील, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. साहजिकच प्रांताधिकारी पांडा यांनी या दांडीबहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सखोल चौकशी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा आपण दांड्या मारल्या व मनमानी कारभार केला तरी आपले काहीच होत नाही, अशी प्रवृत्ती वाढीस लागून त्यांचे मनोबल अधिकच वाढेल. शिवाय जे कर्मचारी प्रामाणिक काम करतात अशांवर अन्यायाची भावना निर्माण होईल. तसे प्रांताधिकारी पांडा हे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. कारण त्यांनी प्रकल्प कार्यालयाबरोबरच शासकीय आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना शिस्त लावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीच्या प्रकाराबाबत नागरिकांना मोठी अपेक्षा आहे. तसे प्रशासकीय मध्यवर्ती इमारतींमुळे एकाच छताखाली डझनभर कार्यालये एकत्र आली आहेत. यात सहायक जिल्हाधिकारीसारख्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे कार्यालयही यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या परिसरातच इतर बहुतेक कार्यालये आहेत. साहजिकच नागरिकांना आपली कामे वेळेवर होतील, अशी रास्त अपेक्षा होती. मात्र कर्मचाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी दमछाक करावी लागते. आता प्रांताधिकारी पांडा यांनी अशा दांडीबहाद्दरांवर वक्रदृष्टी फिरवल्यामुळे त्यांच्या बिनधास्त मनोवृत्तीत निश्चितच थोडाफार तरी बदल होईल. परंतु त्यासाठी प्रांताधिकारी पांडा यांनी अधूनमधून अशी अचानक झाडाझडती घेणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रांचीही चौकशी करावी. कारण बायोमेट्रिक हजेरी आजही कुठेच घेतली जात नसल्याचे म्हटले जात आहे. कुठे हे यंत्र दुरुस्तीअभावी धूळ खात पडले आहे तर कुठे कोरोना महामारीच्या कारणाने बंद करण्यात आले आहे. वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता तेव्हा शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणली होती. साहजिकच त्या वेळी बायोमेट्रिक हजेरीही सुरू होणे अपेक्षित होते. तथापि, ही हजेरी सुरू करण्यासाठी शासनाच्या सूचना अथवा आदेश नाहीत. त्यामुळे ही यंत्रेही तशीच धूळ खात पडली आहेत. शिवाय नागरिकही याबाबत अनभिज्ञ आहेत. बायोमेट्रिक हजेरीबाबत सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी अथवा यंत्रे बसवली आहेत त्याची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी आहे.