शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारातील बिघाड झालेला ट्रान्सफार्मर मिळतो सात दिवसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 15:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  वीज वितरण कंपनीच्या शहादा व नंदुरबार या दोन विभागात एकूण ५४ हजार वीजजोडण्या ह्या कृषीपंपधारक शेतक-यांना दिल्या गेल्या आहेत. यासाठी तब्बल २२० मेगावॉट वीज सध्या वापरली जात असून, रब्बी हंगामात हा वापर वाढून ट्रान्सफार्मर नादुरूस्त होण्याच्या समस्याही वाढत आहेत.            जिल्ह्यात शेतशिवारात होणाऱ्या विजेचा पुरवठा करण्यासाठी ३४ मंडळात वीज ट्रान्सफार्मरर्स लावण्यात आली आहेत. साधारण १० ते १०० किलो वॉट क्षमतेच्या ट्रान्सफार्मर्सवरुन  शेतकऱ्यांना दिवसाच्यावेळी ११० आणि रात्रीच्या वेळी ११० अशी २२० मेगावॉट वीज पुरवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते ४८ तास ते सात दिवसांच्या आत बदलून दिले जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध भागात रब्बी हंगामासाठी विजेचे नियमन करण्यात आले असून, रात्री १० ते सकाळी आठ अशा दहा तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. कंपनीतर्फे दिवस-रात्र शेड्यूलनुसार वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या सर्वच ठिकाणी ट्रान्सफार्मर्स हे चांगले असल्याची माहिती देण्यात आली आहे. परंतू शेतकरी मात्र वीजेचा दाब कमी असल्याचे सांगत आहेत. 

रोहित्र जळाल्याचा ऊस पिकाला बसताेय फटका

            शेत शिवारात सध्या ऊस, केळी, पपई ही बागायती पिके तर गहू, हरभरा ही रब्बी पिके आहेत. वीज पुरवठा बंद झाल्यास या पिकांचे नुकसान होते.   वीज वितरण कंपनीकडून ट्रान्सफार्मर दुरूस्तीसाठी नेल्यानंतर त्यासाठीचा खर्चही तेच करत असल्याची माहिती शेतक-यांनी दिली. 

तक्रार करूनही प्रतिक्षेतच               जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतशिवारातील वीज पुरवठा करणा-या ट्रान्सफार्मर्सची स्थिती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू ट्रान्सफार्मर्स नादुरूस्त झाल्यानंतर मात्र अनंत अडचणींचा सामना शेतकरी करतात. तक्रारींना उशिरा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.  

नजरेसमोर होते पिकांचे नुकसान             एक ट्रान्सफार्मर येण्यास सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. या काळात केेळी, ऊस तसेच इतर रब्बी पिकांना पाणी देण्याची सुविधा नसल्यास पाण्याअभावी पिक करपत असल्याचे शेतकरी पाहतात. समोर दिसूनही नुकसान सोसता येत नसल्याने ते हलबल होतात. 

शेतक-यांना सध्या वेळेवर वीज मिळत आहे. यातून पिकांना पाणी देणे सुरळीत होत आहे. यापूर्वी  मात्र अनेक अडचणी येत होत्या. ट्रान्सफार्मर वेळीच मिळण्यास अडचणी होत्या. अद्यापही आहेत. सात दिवसांऐवजी दोन दिवसात ट्रान्सफार्मर देण्याचे नियोजन कंपनीने करावे. - भगवान देविदास चाैधरी, शेतकरी, मोड ता. तळोदा.

वीज वितरण कंपनीकडून तातडीने कामकाज होते. शेतक-यांच्या तक्रारी निकाली काढण्यावर भर दिला जात आहे. सध्या जिल्ह्यात नादुरूस्त रोहित्रांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यांची दुरूस्तीही तातडीने करुन दिली जात आहे. - ए.ई.बोरसे, अधिक्षक अभियंता