शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

गर्दीमुळे पडू शकते अपयशाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही़ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनलाही बऱ्याच अंशी प्रतिसाद मिळत आहे़ परंतू निर्धारित वेळेत जीवनाश्वक वस्तू खरेदी साठी होणाºया गर्दीमुळे कोरोनाची ठिगणी पडण्याची शक्यता निर्माण झाली असून गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना ओल ठरु लागल्या आहेत़देशात कोरोनाचा संसर्ग थोपवता यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे़ तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजनांना वेग देत सार्वजनिक जागी गर्दी न करण्याचे आदेश काढत संचारबंदी लागू केली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात २२ मार्चपासून संचारबंदी लागू आहे़ या पार्श्वभूमीवर केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच नागरिकांना बाहेर पडण्याचे आदेश आहेत़ या बाजारांमध्येही गर्दी करु नये असे शासनाचे आदेश आहेत़ परंतू सकाळी आठ ते दुपारी १२ यावेळेतच सर्वकाही मिळणार असल्याचा बाऊ करत नागरिक बाजारांमध्ये तोबा गर्दी करत असल्याचे चित्र दुसºया दिवशीही समोर आले आहे़ यात बँकांच्या बाहेरही अशीच गर्दी कायम असल्याने चिंता वाढल्या असून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशांचे पायमल्ली होणे सुरु झाल्याने भाजीपाला बाजाराला आठवड्यातून तीनच दिवस परवानगी द्यावी अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे़नंदुरबार शहरातील नेहरु चौक, हाटदरवाजा, मंगळबाजार, गांधीपुतळा व महाराष्ट्र व्यायाम शाळा या परिसरात किराणा मालाची दुकाने आणि भाजीपाला विक्रीची दुकाने आहेत़ यातून लॉकडाऊन दरम्यान शहरासह शहरालगतच्या गावांमधून नागरिक येथे निर्धारित केलेल्या वेळेत येत आहेत़ परंतू गेल्या दोन दिवसात गर्दीत वाढ झाल्याचे चित्र आहे़ जीवनावश्यवक वस्तूंचा साठा न करता लागेल तेवढेच घेणे बंधनकारक असतानाही वाढीव वस्तूंच्या खरेदीला काही नागरिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे़दरम्यान गर्दी कमी होऊन नागरिकांना भाजीपाला मिळावा यासाठी शहरातील विविध भागात जागा निश्चित करण्यात आल्या आहेत़ नियोजित तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर विशिष्ट अंतर ठेवून भाजीपाला विक्री करण्याचे आदेश आहेत़ तसेच शहरातील गिरीविहार, सिंधी कॉलनी, हाटदरवाजा आणि मंगळबाजारातही जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी एखाद्या कुटुंबातील एकाच व्यक्तीने बाहेर पडणे अपेक्षित असतानाही गर्दी वाढत असल्याचे प्रशासनाला दिसून आल्याने त्यांच्याकडून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु झाल्या आहेत़दरम्यान सोमवारीही जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी नागरिकांसोबत संवाद साधत विविध सूचना केल्या होत्या़ यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शिधापत्रिकाधारक नागरिकांना तीन महिन्याचे रेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुकानदारांनी आॅनलाईन आॅर्डर घेऊन घरपोच सेवा देण्यासारखे उपक्रम राबवावे़ जिल्ह्यात फळे व भाजीपाला वाहतूक सुरळीत रहावी यासाठी आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी बांधवांना शेतमाल बाजारात आणताना अडचण येऊ नये यासाठी त्यांना पास देण्याचे अधिकार मंडळ कृषि अधिकारी यांना देण्यात आले आहेत. यामुळे आवक वाढून बाजारात कोणत्याही जीवनावश्यक वस्तूची टंचाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असतानाही नागरिक भाजीपाला खरेदीसाठी नियमित गर्दी करत असल्याचे चित्र सर्रास नजरेस पडत आहे़शहरातील विविध भागात हातागाड्या आणि चारचाकी वाहनांद्वारे भाजीपाला पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़भाजीपाला बाजारांचे विलगीकरण करण्यासाठी प्रशासन सातत्याने पालिका प्रशासनाच्या संपर्कात असून गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे़शहरी भागात भाजीपाला पुरवठा करणाºया शेतकºयांना वेळोवेळी सूचना करुन शहरातील विविध भागात भाजीपाला पुरवठा करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती असून बुधवारपासून कार्यवाही होईल़