शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धुळे़ २२२ कर्जमुक्त शेतकºयांनाच पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:56 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात केवळ २२२ पात्र शेतकऱ्यांना ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात केवळ २२२ पात्र शेतकऱ्यांना धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज देण्यात आले आहे़ शासनाने केलेल्या आदेशानुसार अपात्र शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली असून ही रक्कम मंजूर झाल्यानंतर लाभार्थी शेतकºयांची खाती निल झाल्यानंतर त्यांना कर्ज देण्यात येणार आहे़नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख ६ हजार सभासद खातेदार असलेल्या जिल्हा बँकेने एप्रिल महिन्यापासून कर्ज वाटप सुरु केले आहे़ यांतर्गत जिल्ह्यात ३ हजार शेतकºयांना पीक कर्ज दिले आहे़ एकूण ३५ कोटी रुपयांच्या या कर्जवाटपातील बहुतांश शेतकरी हे मागील वर्षाचा पीक कर्ज परतावा करणारे आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी आहेत़ परंतू खातेदार असलेल्या जिल्ह्यातील १३ हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचा प्रश्न मात्र प्रलंबित आहे़ हे शेतकरी महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेत समाविष्ट आहेत़ त्यांना सरसकट कर्ज देण्याचे शासनाचे आदेश असले तरी ७५ कोटी रुपयांचा कर्जवाटप लक्षांक घेणाºया जिल्हा बँकेकडे या शेतकºयांचे माफ केलेले कर्ज भरण्यासाठी रक्कम नसल्याने बँकेने शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांचे कर्ज मागितले आहे़ ही रक्कम धुळे आणि नंदुरबार अशा दोन्ही जिल्ह्यातील १४ हजार ३४० शेतकºयांसाठी आहे़ यात सर्वाधिक १३ हजार शेतकरी हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत़ या १३ हजार शेतकºयांचे अर्ज महात्मा फुले कृषी मुक्ती योजनेत समाविष्ट असून त्यांच्या पात्रतेच्या याद्या ह्या अद्याप प्रकाशित व्हायच्या आहेत़ परंतू तत्पूर्वी शेतकºयांना अडचण नको म्हणून शासनाने कर्जवितरणाचे आदेश दिले आहेत़ मात्र या शेतकºयांची खाती आधी नील करायची असल्याने जिल्हा बँकेने शिखर बॅकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे़दरम्यान एकीकडे जिल्हा बँक शिखर बँकेकडे पत्र पाठवून कर्ज मागणी करत असताना दुसरीकडे बँकेने शासनाकडे पत्र देऊन शेतकºयांची माहिती असलेल्या याद्याही मागवल्या आहेत़ परंतू शासनाकडून जिल्हा बँकेला शेतकºयांच्या नावाच्या याद्या देण्यात आलेल्या नसल्याने कामकाज रखडत आहे़विशेष बाब म्हणजे लाभ न मिळालेल्या शेतकºयांना सोमवार सकाळपासून जिल्हा बॅँकेच्या शाखांमधून कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत़ परंतू शनिवारपर्यंत राज्य शासनाकडून शेतकºयांच्या याद्या न मिळाल्याने कर्ज वाटप होणार किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़

४जिल्हा बँकेचे नंदुरबार जिल्ह्यात एकूण १ लाख ६ हजार खातेदार आहेत़ तर २३५ विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून ३७ हजार ७०२ सभासद शेतकरी आहेत़ यात शहादा १३ हजार ८२६, नंदुरबार ११ हजार ८८, नवापुर ५ हजार ६४३, तळोदा १ हजार ८३१, अक्कलकुवा ७२६ तर धडगाव तालुक्यात ४ हजार ५८८ सभासदांचा समावेश आहे़४१ लाख ४० च्या जवळपास असलेल्या या खातेदार सभासदांपैकी ३७ हजार ७०२ सभासद हे किसान क्रेडीट कार्डचा वापर करतात़ जिल्ह्यात बँकेच्या एकूण १९ हजार ९६ शेतकऱ्यांना रुपे कार्ड देण्यात आले असून गेल्या हंगामापासून ते याद्वारे मंजूर झालेले कर्ज इतर बँकांच्या एटीएममधून घेत आहेत़ बँकेचे १४ हजार ३१३ शेतकरी सभासद हे नियमित खातेदार असून त्यांच्याकडून वेळोवेळी कर्ज घेऊन त्याचा परतावा करण्यात येत आहे़४नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या ५६५ खातेदार सभासद शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला असून ४३९ शेतकºयांना पीएक किसानचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ रुपे कार्डच्या माध्यमातून शनिवारअखेरपर्यंत जिल्हा बँकेच्या २९ शाखांमधून साडेतीन हजार शेतकºयांना यंदाच्या हंगामात कर्ज वाटप केले असून सोमवारपासून इतर शेतकºयांना याच पद्धतीने कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ ४महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या १३ हजार ३६८ शेतकºयांना लाभ मिळणार आहे़ हे शेतकरी जिल्हा बँकेचे खातेदार असून त्यांना कर्ज देण्यासाठी बँकेकडे रक्कम नाही़ यातून बँकेने या शेतकºयांची मागील थकबाकी नील करुन त्यांना नवीन कर्ज देण्यासाठी शिखर बँकेकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे़ २ जून रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज चौधरी यांनी हा पत्रव्यवहार केला असून लवकरच त्याचे उत्तर येणार आहे़ दरमयन बँकेने या १३ हजार शेतकºयांना माफ झालेल्या कर्जाच्या रकमेची माहिती मागवली आहे़ परंतू राज्यशासनाच्या महा आयटी टीम कडून योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांची नावे आणि रक्कम याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही़ ही नावे आणि रक्कम प्राप्त झाल्यानंतर कामकाज सुरु ठेवत ९० कोटी रुपयांच्या वाटपाचे नियोजन करणे सोपे होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेकडून देण्यात आली आहे़ ४जिल्हा बँकेने २ जून पर्यंत जिल्ह्यातील ३ हजार ८१९ सभासद आणि १९० विविध कार्यकारी संस्था यांना ३४ कोटी ९२ लाख ४४ हजार रुपयांचे कर्ज दिले आहे़ आतापर्यंत बँकेने निर्धारित लक्षांकाच्या ५७ कर्जाचे वाटप पूर्ण केले आहे़ यातून आतापर्यंत ५ हजार ८१९ हेक्टर जमिन संरक्षित झाली आहे़४महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजेनेंतर्गत जिल्ह्यात २२२ शेतकरी पात्र ठरले आहेत़ या शेतकºयांना १ कोटी ३ हजार रुपयांचे पीक कर्जही वाटप करण्यात आले आहे़ सोमवारी पात्र शेतकºयांच्या याद्या प्राप्त झाल्यास त्यांना आणखी कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ सोमवारी बँकेची बैठक होणार असून यानंतर १३ हजार शेतकºयांबाबत निर्णय होणार आहे़ शिखर बँकेकडे पत्र पाठवून कर्जाची मागणी केली असून १३ हजार शेतकºयांच्या बँक खात्यावरचे मागचे कर्ज नील होवून एनए रिपोर्ट आल्यानंतर नवीन पीक कर्ज वाटपाला तातडीने सुरु होणार आहे़-जी़एऩपाटील, विभागीय व्यवस्थापक, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,