शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

प्रहारतर्फे मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतक:यांवर अस्मानी-सुलतानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: खचला आहे. पंचनाम्यांचे सोपस्कारही पुर्ण करण्यात आले. भरपाई वेळेवर मिळाली तर शेतक:यास रब्बी हंगामाच्या भांडवलासाठी कामात येईल. त्यामुळे सरकसकट 25 हजाराची भरपाईची रक्कम त्वरित द्यावी. या मागणीसाठी प्रहार संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक शेतक:यांनी एकत्र येत प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी माहिती देतांना जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी सांगितले, जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळात होळपळत आहे. दुष्काळाच्या झळा सोसणा:या शेतक:यांवर यंदा वरूण राजाने मेहर केली. चांगला पाऊस झाला मात्र तो पाऊस हातातोंडातील घास घेऊन जाईल, असे वाटले नव्हते. सर्वत्र शेतकरी समाधानी असतांना पावसाने मात्र कहरच केला. एवढा बरसला की, सर्वत्र जलमय झाले. त्यातून अतिवृष्टीचे संकट उभे राहिले. त्यानंतर काही शेतक:यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरी खचला आहे.अस्मानी-सुलतानी संकटाने बेजार झालेले असतांना शेतक:यांचा कोणीही वाली उरला नाही. राज्यात शासन स्थापनेचे सत्तानाटय़ रंगले आहे. त्यातून राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे शेतक:यांचे नुकसानीचे पंचनमे झाले. त्यांना सरसकट 25 हजारांची भरपाई  द्यावी म्हणून गेल्या आठवडय़ात जिल्हाधिका:यांमार्फत निवेदन देण्यात आले होते. भरपाई त्वरित न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र सत्तानाटय़ व राष्ट्रपती राजवट यामुळे शेतक:यांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खरीप हातातून गेलेल्या शेतक:यांना रब्बीची आस आहे. मात्र त्यासाठी हातात पैसा नाही. म्हणून जर नुकसानभरपाईची रक्कम त्वरित दिली तर रब्बीसाठी ती कामात येईल. त्यासाठी त्वरित भरपाईची रक्कम मागणीचे कळविले असताना, शेतक:यांना अद्याप ती मिळाली नाही. म्हणून प्रहार शेतकरी संघटनेतर्फे  ठिय्या आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात बारकू  शिरोळे , मोहन पाटील, प्रमोद दगडू पाटील, सावळीराम करे, गजानन वसावे, उदयसिंग गिरासे, शशिकांत पाटील, प्रभाकर पाटील, सुदाम  वरसाळे, शरद साळवे, ब्रिजलाल धनगर, संजय पाटील, राणूलाल जैन, चपाय राऊत, दिपाल्या वसावे, रामसिग वसावे सहभागी झाले होते.

जिल्ह्यात मनाई आदेश असतांना आंदोलन करू नये अशा सुचना प्रशासनातर्फे आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. परंतु तरीही संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देतांना आंदोलकांना पोलिसीन ताब्यात घेतले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. सर्व आंदोलकांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.