लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी नवापुर येथे दोन तर सारंगखेडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गुजरात राज्यातील निझर येथून ही वाळू औरंगाबाद व नाशिकच्या दिशेने जात होती़कोरोना संसर्ग होवू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी गुजरात राज्यातून उपसा केलेल्या वाळूची महाराष्ट्र राज्यातून वाहतूक करण्यास बंदी केली आहे़ याप्रकरणी कारवाईचे सत्र सुरु आहे़नवापुरशनिवारी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर महसूल विभागाने एमएच-१५-एफजी-४७५५, एमएच १५-जीव्ही-८४५५ या वाहनांमधून वाळू वाहतूक केली जात असल्याने कारवाई केली होती़ ही वाळू नाशिक येथे नेली जात होती़ याप्रकरणी मंडळाधिकारी नागेश मोतीलाल चौधरी यांनी नवापुर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे़ यानुसार वाळू वाहतूक करणारे चालक अविनाश वसंत कोहकडे व सागर विश्राम पोरजे दोघे रा़ नाशिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नवापुर येथे १० दिवसात तब्बल १५ जणांविरोधात मनाई आदेशांचे उल्लंघन करुन वाळू वाहतूक केल्याप्ररणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंपी करत आहेत़सारंगखेडासात जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने सारंगखेडा ता़ शहादा येथे शहादा-दोंडाईचा रस्त्यावर तापी बॅरेजजवळ एमएच २१ बीएच २९०५, एमएच २० ईझेड ५२७३, एमएच २० ईएल १७०७ व एमएच ईएल ९६०० हे वाळू भरुन नेणारे ट्रक जप्त केले होते़ निझर येथून जिल्हामार्गाने ही वाळू औरंगाबाद येथे नेण्यात येत होती़याप्रकरणी मंडळाधिकारी जुबेर पठाण यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुश्ताक शेख अहमद रा़ औरंगाबाद, राजेश मानसिंग राठोड रा़ करेगाव ता़ चाळीसगाव, सुनील मगन जाधव रा़ खेडी सोनगाव व मगन मानसिंग राठोड रा़ करगाव यांच्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत़
वाळू वाहतूक प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:12 IST