लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी उखडून फेकल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.शेतकºयांनी महागडे बी-बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरीचा खर्च करुन कापसाच्या पिकाचे संगोपन केले. मात्र अज्ञात समाजकंटकांकडून पिकांचे नुकसान होत असून शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. २८ जुलै रोजीही पिकांचे नुकसान झाल्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र ‘पोलीस सुस्त व समाजकंटक मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रीया धुरखेडा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.धुरखेडा येथील अंबालाल गोरख पाटील यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस लागवड केली आहे. सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी या शेतातील ५०० ते ६०० कापसाची झाडे उपटून फेकून दिली आहेत.गेल्याच महिन्यात याच शिवारात तुकाराम श्रीपत पाटील, खंडू गिरधर पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील कापूस पीक उपटून फेकण्यात आले होते. त्याची लेखी तक्रार पोलिसांत देऊन अज्ञात लोकांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या घटनेतील आरोपींचा अद्यापही शोध लागलेला नाही.शेतकºयांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाºयांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाइ करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत धुरखेडा येथील सर्व शेतकरी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.वारंवारच्या या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.समाजकंटकांना ठोस शिक्षा झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनानेही थेट कारवाईसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकºयांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहचविणे देखील आवश्यक आहे.
कापूस पिकाची झाडे उपटून नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:51 IST