शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

कापूस पिकाची झाडे उपटून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : धुरखेडा, ता.शहादा येथील शेतकऱ्यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस पिकाची सुमारे ५०० झाडे अज्ञात लोकांनी उखडून फेकल्याची घटना घडली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महिनाभरातील ही दुसरी घटना असून पोलिसांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.शेतकºयांनी महागडे बी-बियाणे, खते, औषध फवारणी, मजुरीचा खर्च करुन कापसाच्या पिकाचे संगोपन केले. मात्र अज्ञात समाजकंटकांकडून पिकांचे नुकसान होत असून शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. २८ जुलै रोजीही पिकांचे नुकसान झाल्याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र ‘पोलीस सुस्त व समाजकंटक मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रीया धुरखेडा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.धुरखेडा येथील अंबालाल गोरख पाटील यांच्या प्रकाशा शिवारातील शेतात कापूस लागवड केली आहे. सोमवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी या शेतातील ५०० ते ६०० कापसाची झाडे उपटून फेकून दिली आहेत.गेल्याच महिन्यात याच शिवारात तुकाराम श्रीपत पाटील, खंडू गिरधर पाटील यांच्या एक एकर क्षेत्रातील कापूस पीक उपटून फेकण्यात आले होते. त्याची लेखी तक्रार पोलिसांत देऊन अज्ञात लोकांविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या घटनेतील आरोपींचा अद्यापही शोध लागलेला नाही.शेतकºयांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान करणाºयांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाइ करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. याबाबत धुरखेडा येथील सर्व शेतकरी शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.वारंवारच्या या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.समाजकंटकांना ठोस शिक्षा झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. त्यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनानेही थेट कारवाईसाठी पुढे येणे गरजेचे आहे. शेतकºयांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहचविणे देखील आवश्यक आहे.