शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

इंजेक्शनअभावीच जिल्ह्यात कोरोनाबाधींतांच्या मृत्यूचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांची कुठलीही काळजी घेतली जात नाही. या सर्व बाबींची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधीतांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. कोविड कक्षातील अनागोंदी आणि असुविधांबाबत तक्रारी होत आहेत. कोरोनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बाबींची दखल घेऊन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे. पत्रात म्हटले आहे की, नंदुरबार हा आदिवासी जिल्हा असून गुजरात व मध्यप्रदेशच्या सिमेवर आहे. दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची, माल वाहतुकीची ये-जा सुरू असते. सद्य स्थितीत नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर देखील वाढला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू ही चिंतेची बाब ठरली आहे.जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन उपलब्ध नाहीत. रुग्ण गंभीर झाल्यावर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्याला जीव गमवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाला शासनाकडून कोविड-१९ साठी लागणारे टोसीलाझुमाब व रेमडीसीव्हर हे इंजेक्शन का दिले जात नाही? या बाबीची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होणे गरजेचे आहे. इंजेक्शन अभावी आणखी किती जणांचे बळी जाऊ देण्याची वाट पहाणार आहात? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. डॉक्टर मंडळी देखील दुर्लक्ष करीत आहेत. रुग्ण व नातेवाईकांच्या या तक्रारी वाढत आहेत.या सर्व बाबींची आपल्या स्तरावर दखल घेऊन चौकशी करावी, आरोग्य सेवा व आवश्यक इंजेक्शन, औषधी तातडीने उपलब्ध करावी अशी मागणीही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या पत्रात केली आहे.राजकीय नेता व लोकप्रतिनिधीकडून प्रथमच अशा प्रकारची तक्रार केली गेल्याने त्याकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. आरोग्य मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. त्यामुळे कार्यवाहीकडे आता लक्ष लागून आहे.