हा रस्ता गेल्या वर्षभरापासून पूर्ण उखडून गेलेला आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. त्याच्या दुरुस्तीसाठी सातत्याने लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, वाहनचालक वारंवार मागणी करीत होते. याबाबत ‘लोकमत’नेही सातत्याने मागणी लावून धरली होती. शेवटी त्याचे दुरुस्तीचे सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर काढून ते औरंगाबादच्या साई कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले असून, लवकरच कामाला सुरुवात करणार आहेत. हा रस्ता चार लेयरचा तयार होणार असून, या रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ करण्याची मागणी खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच गुजराबाई गावित, उपसरपंच शीतल शिंदे, सदस्य शैलेश गावित व सर्व सदस्यांनी केली.
रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करून वाहनधारकांची गैरसोय दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदारांचे प्रतिनिधी अजय परदेशी यांनी रस्त्याचे काम लवकर सुरू करून पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस खुला करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले असून, हा स्ता थेट खांडबारा चौफुलीपर्यंत तयार करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.