शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या कालावधीत कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता उपाययोजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. जिल्ह्यांच्या सीमाच बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर ...

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. जिल्ह्यांच्या सीमाच बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन महिने नागरिक पूर्णपणे घरातच बसून होते. वाहतूक थांबली, सामाजिक, धार्मिक सर्वच कार्यक्रमांवर बंदी आणल्यामुळे व्यक्ती मोठ्या प्रमाणावर एकत्र येणे थांबले. गेल्यावर्षीही कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी होळीला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेऊन धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणल्याने तसेच संचारबंदी असल्याने सर्वच धार्मिक विधी रद्द करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. एप्रिल अखेरपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मे महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी शिथील करण्यात आले. त्यांनतर कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर हळूहळू ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. मात्र जानेवारीपासून पुन्हा लोकांच्या बेफिकिरीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

आता होळीचा सण जवळ आल्याने परराज्यात गेलेले मजूर मोठ्या प्रमाणावर गावाला येत असून अजून काही मजूर येणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. गेल्यावर्षीसारखे पुन्हा आता जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे.

तपासणी नाके सतर्क व्हावे

परराज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर मोठ्या संख्येने होळी सणासोबतच इतर सण-उत्सव साजरा करण्यासाठी दाखल होत आहेत. यासाठी प्रशासनाने सतर्क होऊन कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी तपासणी नाके सतर्क करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.