शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

होळीच्या कालावधीत कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता उपाययोजनेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. जिल्ह्यांच्या सीमाच बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर ...

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला प्रारंभ झाला. जिल्ह्यांच्या सीमाच बंद करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन महिने नागरिक पूर्णपणे घरातच बसून होते. वाहतूक थांबली, सामाजिक, धार्मिक सर्वच कार्यक्रमांवर बंदी आणल्यामुळे व्यक्ती मोठ्या प्रमाणावर एकत्र येणे थांबले. गेल्यावर्षीही कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळी होळीला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेऊन धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणल्याने तसेच संचारबंदी असल्याने सर्वच धार्मिक विधी रद्द करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात होता. एप्रिल अखेरपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मे महिन्यात लॉकडाऊन काहीअंशी शिथील करण्यात आले. त्यांनतर कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर हळूहळू ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला होता. मात्र जानेवारीपासून पुन्हा लोकांच्या बेफिकिरीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

आता होळीचा सण जवळ आल्याने परराज्यात गेलेले मजूर मोठ्या प्रमाणावर गावाला येत असून अजून काही मजूर येणार हे निश्चित आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. गेल्यावर्षीसारखे पुन्हा आता जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे.

तपासणी नाके सतर्क व्हावे

परराज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेले मजूर मोठ्या संख्येने होळी सणासोबतच इतर सण-उत्सव साजरा करण्यासाठी दाखल होत आहेत. यासाठी प्रशासनाने सतर्क होऊन कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी तपासणी नाके सतर्क करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.