शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 12, 2024 06:16 IST

जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी

रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : भगवान राम आणि शबरीचे पुजारी म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील महिला आणि सामान्य जनतेवर सर्वाधिक अन्याय झाले असून, त्यावर देशातील भाजप सरकारने कुठलीही भूमिका न घेता चूप बसून होते. त्यामुळे केवळ लोकांच्या मतांसाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे. म्हणून या सरकारला आता खाली खेचून देशातील गरीब, आदिवासी, दलित, शोषितांची भाषा समजणाऱ्या काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केले.

नंदुरबार येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री आमदार ॲड. के.सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, नसीम खान यांच्यासह मविआचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘ते’ गरिबांचे नव्हे, तर उद्योगपतींचे उद्धारकर्ते 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गरिबांचे उद्धारकर्ते मानतात मात्र प्रत्यक्षात हे गरिबांचे नव्हे तर अरबपती, खरबपती, उद्योगपतींचे उद्धारकर्ते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशातील सर्वोच्च पद दिल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र, त्याच आदिवासी राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आणि राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले जात नाही. जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

जनतेचे प्रश्न ‘त्यांना’ काय कळणार? 

पंतप्रधान झाल्यानंतर आजवर ते कधी गरीब, आदिवासींच्या घरात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही. त्यांना या देशातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे प्रश्न काय आहेत, ते काय कळणार? या देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी अशा दिग्गज पंतप्रधानांची परंपरा लाभली असताना नरेंद्र मोदी यांनी या पदाची गरीमा घालविली, असा आरोपही प्रियांका यांनी केला. त्यांचेच जवळचे नेते जेव्हा सार्वजनिक सभांमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात त्यावेळी हे केवळ बघ्याची भूमिका घेतात, असेही त्या म्हणाल्या. ५२ मिनिटांच्या भाषणात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. आमदारांना खरेदी करून दबावतंत्राने पक्षांची तोडफोड करून सत्ता बळकावण्याचे कारस्थान काँग्रेस कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस