शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 12, 2024 06:16 IST

जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी

रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : भगवान राम आणि शबरीचे पुजारी म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील महिला आणि सामान्य जनतेवर सर्वाधिक अन्याय झाले असून, त्यावर देशातील भाजप सरकारने कुठलीही भूमिका न घेता चूप बसून होते. त्यामुळे केवळ लोकांच्या मतांसाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे. म्हणून या सरकारला आता खाली खेचून देशातील गरीब, आदिवासी, दलित, शोषितांची भाषा समजणाऱ्या काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केले.

नंदुरबार येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री आमदार ॲड. के.सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, नसीम खान यांच्यासह मविआचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘ते’ गरिबांचे नव्हे, तर उद्योगपतींचे उद्धारकर्ते 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गरिबांचे उद्धारकर्ते मानतात मात्र प्रत्यक्षात हे गरिबांचे नव्हे तर अरबपती, खरबपती, उद्योगपतींचे उद्धारकर्ते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशातील सर्वोच्च पद दिल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र, त्याच आदिवासी राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आणि राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले जात नाही. जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

जनतेचे प्रश्न ‘त्यांना’ काय कळणार? 

पंतप्रधान झाल्यानंतर आजवर ते कधी गरीब, आदिवासींच्या घरात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही. त्यांना या देशातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे प्रश्न काय आहेत, ते काय कळणार? या देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी अशा दिग्गज पंतप्रधानांची परंपरा लाभली असताना नरेंद्र मोदी यांनी या पदाची गरीमा घालविली, असा आरोपही प्रियांका यांनी केला. त्यांचेच जवळचे नेते जेव्हा सार्वजनिक सभांमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात त्यावेळी हे केवळ बघ्याची भूमिका घेतात, असेही त्या म्हणाल्या. ५२ मिनिटांच्या भाषणात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. आमदारांना खरेदी करून दबावतंत्राने पक्षांची तोडफोड करून सत्ता बळकावण्याचे कारस्थान काँग्रेस कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस