शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: May 12, 2024 06:16 IST

जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी

रमाकांत पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : भगवान राम आणि शबरीचे पुजारी म्हणवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशातील महिला आणि सामान्य जनतेवर सर्वाधिक अन्याय झाले असून, त्यावर देशातील भाजप सरकारने कुठलीही भूमिका न घेता चूप बसून होते. त्यामुळे केवळ लोकांच्या मतांसाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करीत आहे. म्हणून या सरकारला आता खाली खेचून देशातील गरीब, आदिवासी, दलित, शोषितांची भाषा समजणाऱ्या काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केले.

नंदुरबार येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री आमदार ॲड. के.सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक, नसीम खान यांच्यासह मविआचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘ते’ गरिबांचे नव्हे, तर उद्योगपतींचे उद्धारकर्ते 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गरिबांचे उद्धारकर्ते मानतात मात्र प्रत्यक्षात हे गरिबांचे नव्हे तर अरबपती, खरबपती, उद्योगपतींचे उद्धारकर्ते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देशातील सर्वोच्च पद दिल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र, त्याच आदिवासी राष्ट्रपतींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आणि राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले जात नाही. जनतेसमोर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चेच प्रश्न मांडून अश्रू गाळतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

जनतेचे प्रश्न ‘त्यांना’ काय कळणार? 

पंतप्रधान झाल्यानंतर आजवर ते कधी गरीब, आदिवासींच्या घरात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले नाही. त्यांना या देशातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे, आदिवासींचे प्रश्न काय आहेत, ते काय कळणार? या देशाला इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी अशा दिग्गज पंतप्रधानांची परंपरा लाभली असताना नरेंद्र मोदी यांनी या पदाची गरीमा घालविली, असा आरोपही प्रियांका यांनी केला. त्यांचेच जवळचे नेते जेव्हा सार्वजनिक सभांमध्ये संविधान बदलण्याची भाषा करतात त्यावेळी हे केवळ बघ्याची भूमिका घेतात, असेही त्या म्हणाल्या. ५२ मिनिटांच्या भाषणात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. आमदारांना खरेदी करून दबावतंत्राने पक्षांची तोडफोड करून सत्ता बळकावण्याचे कारस्थान काँग्रेस कधीही करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेस