शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

शेतकऱ्यावर हल्ला करणाºया प्राण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:23 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ‘एकादशीचा फराळ बनवून ठेवा मी आता शेतातून ट्रॅक्टरवर चक्कर मारुन येतो’ ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : ‘एकादशीचा फराळ बनवून ठेवा मी आता शेतातून ट्रॅक्टरवर चक्कर मारुन येतो’ असे सांगून गेलेले मोहिदे ता़ तळोदा शेतकरी शरद चव्हाण हे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाले़ सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे तळोदा तालुक्यात भितीचे वातावरण आहे़ मंगळवारी पहाटेच्या सुमारास मयत शरद चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़हल्ला करणाºया प्राण्याबाबत संभ्रम कायम असून बिबट्याऐवजी अस्वलाने हल्ला केला असावा असे आता वनविभाग सांगत आहे़ याबाबत अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी या भागात बिबट्याच्याही पायांचे ठसे मिळाले आहेत़ मोहिदा येथील शरद खंडू चव्हाण सोमवारी सायंकाळी नवीन घेतलेले लहान ट्रॅक्टर घेऊन शेताकडे गेले होते़ शेतात चक्कर मारुन आल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास ते शेतबांधावर असताना मागून आलेल्या हिंस्त्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले होते़ हल्ल्यावेळी या भागात कोणीही नसल्याने त्यांना वेळेवर मदत मिळू शकली नाही़ ते फोन उचलत नसल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत पडले होते़ मुलगा थेट शेतात गेल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला़ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले़ या घटनेनंतर मोहिदा गाव आणि परिसर स्तब्ध झाला आहे़ समाजकार्य आणि ग्रामस्थांच्या मदतीत अग्रेसर राहणाºया चव्हाण यांच्या मृत्यूने गावावरही दु:खाचे सावट पसरले आहे़ दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार राजेश पाडवी, वनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक उपवनसंरक्षक ई़बी़चौधरी, तहसीलदार पंकज लोखंडे, वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़तालुक्यात आमलाड, रांझणी, अमोणी, रापापूर येथे श्वापंदांचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ शेतशिवारात बिबट्या व अस्वलांचा संचार असताना उपाययोजना न करता विभागाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे़हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना वनविभागाकडून १५ लाख रुपयांची मदत दिली जाते़ यातील तीन लाख रुपयांची मदत ही जागेवर दिली जाते़ तथापि मयत चव्हाण यांच्या नातेवाईकांना ही मदत अद्याप मिळालेली नाही़ शासनाने ही मदत देण्याबाबत उपवनसंरक्षक यांना दिलेले अधिकार काढून घेतल्याने ही मदत थांबल्याचे सूत्रांनी म्हटले आहे़ मयत चव्हाण यांच्या कुटूंबाची भेट घेणाºया अधिकाºयांनी मदतीचे आश्वासन दिले आहे़मंगळवारी वनविभागाने मोहिदा शिवारात पाच ट्रॅप कॅमेरे, तीन पिंजरे व कर्मचारी गस्तीसाठी नियुक्त केले आहेत़मंगळवारी पहाटे चव्हाण यांचे पार्थिव मोहिदा येथे आणल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता़ त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे़ मोहिदा येथील विकासोचे चेअरमन असलेले चव्हाण हे शेतकºयांच्या हक्कासाठी वेळावेळी लढत होते़