शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश-टक्का वाढल्याने राहील स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी निकालाचा टक्का यंदा वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आता तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दहावी निकालाचा टक्का यंदा वाढला आहे. अकरावी प्रवेशासाठी आता तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात अकरावीच्या तुकड्या लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी स्थिती असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणने आहे. असे असले तरी यंदा विद्यार्थ्यांना वाढलेल्या टक्केवारीमुळे प्रवेशासाठी स्पर्धा राहणार हे मात्र नक्की. त्यासाठी शिक्षण विभागाला अशा कनिष्ठ महाविद्यालयांकडे लक्ष ठेवावे लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात अकरावीच्या १६,३२० जागा असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८,३७८ इतकी आहे.दहाीचा आॅनलाईन निकाल नुकताच लागला आहे. यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा राहणार आहे. लवकरच अकरावी वर्गाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. दरवर्षी अकरावीच्या विज्ञान वर्गात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते.यंदाही ते चित्र कायम राहणार आहे. चांगले महाविद्यालय मिळावे यासाठी विद्यार्थ्यांचा कल अशा ठिकाणी राहण्याची शक्यता कायम आहे. दहावीनंतर इतर शाखांकडे जाणाऱ्यांची संख्या अतिशय कमी असते.बारावीनंतरच इतर शाखांकडे जाण्याची ओढ असते. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना ११ व १२ वी करण्यास उद्युक्त करतात. परिणामी अकरावी प्रवेशासाठी मोठी चढाओढ असते. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील मोजक्याच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्थ्यांचा कल असतो. अशा ठिकाणी मोठी स्पर्धा असते. परिणामी मेरीट देखील वाढलेले असते. अशा महाविद्यालयांमध्ये मग जादा तुकडीचे फॅड तयार होऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा शैक्षणिक शुल्क उकळले जाते.कनिष्ठ महाविद्यालयांची संख्याजिल्ह्यात एकुण ७६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यात सर्वाधिक नंदुरबार तालुक्यात तर सर्वात कमी धडगाव तालुक्यात आहे. नंदुरबार तालुक्यात २१ अनुदानीत तर सात विनाअनुदानीत/ स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण २८ आहेत.नवापूर तालुक्यात नऊ अनुदानीत व तीन विनाअनुदानीत असे एकुण १२, शहादा तालुक्यात १५ अनुदानीत व पाच विनाअनुदानीत किंवा स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण २० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तळोदा तालुक्यात चार अनुदानीत व दोन विनाअनुदानीत असे सहा, अक्कलकुवा तालुक्यात तीन अनुदानीत व पाच विनाअनुदानीत असे एकुण आठ तर धडगाव तालुक्यात एक अनुदानीत व एक विना अनुदानीत असे एकुण दोन कनिष्ठ महाविद्यालय आहेत. एकुण ५३ अनुदानीत व २३ विना अनुदानीत/ स्वयंअर्थसहाय्यीत असे एकुण ७६ कनिष्ठ महाविद्यालये जिल्ह्यात आहेत.प्रवेश प्रक्रिया तर राबविली जाईल, परंतु प्रत्यक्षात शाळा, महाविद्यालये कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला तरी घरूनच अभ्यास करावा लागणार आहे.प्रवेश प्रक्रिया देखील कोरोनाचे सर्व नियम पाळत, विद्यार्थ्यांना कमीत कमी वेळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कला शाखेची यंदाही पंचायतविज्ञान शाखेकडे असलेला कल लक्षात घेता कला शाखेला दरवर्षी विद्यार्थी मिळविण्यासाठी कसरत करावी लागते. यंदाही ती परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कला शाखेच्या अनुदानीत, विनाअनुदानीत अशा एकुण ९३ तुकड्या आहेत. त्यामुळे तुकड्या टिकविण्यासाठी संस्थाचालकांची आणि शिक्षकांचीही कसरत होत आहे. परिणामी गावोगावी शिक्षकांना फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना गोळा करावे लागते. विद्यार्थ्यांची पास काढणे, त्यांचे प्रवेश करून देणे असे प्रकार करावे लागतात.विज्ञान शाखेकडे कलविज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल यंदाही राहणार आहे. विज्ञान शाखेच्या तुकड्यांची संख्या ८३ आहे. त्यात ३२ अनुदानीत, ४२ विना अनुदानीत, एक कायम विनाअनुदानीत तर आठ स्वयंअर्थसहाय्यीत तुकड्या आहेत. विज्ञान शाखेत एकुण ७,१२० जागा आहेत.वाणिज्य व संयुक्तवाणिज्य व संयुक्त विभागाकडे जाण्याचा कल कमी राहत असल्याने या विभागाच्या तुकड्या व जागाही कमी असतात. वाणिज्यच्या ६८० तर संयुक्तच्या ४४० जागा आहेत.