शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीवरील साखळी बंधाऱ्याच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ...

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ७ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिले होते. उन्हाळाच्या सुरुवातीलाच शहादा तालुक्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी जाणवत आहे. यात गोमाई नदीवर मध्य प्रदेश सिमेत मोठा बंधारा बांधला गेल्याने हे पाणी मध्य प्रदेशातच अडविले गेले आहे. त्यामुळे गोमाई नदीचे महाराष्ट्रातील पात्र हे कोरडेच आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर व जनावरांना बसला आहे. भविष्यात नदीलगतच्या गावांना प्रचंड पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून गोमाई नदीवर काही ठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधून नदी पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शहाद्याचे तत्कालीन प्रांताधिकारी साताळकर यांना गोमाई नदीविषयी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.

नदीचे पाणी वाहून जाऊ नये व शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या भागातील गोगापूर, दामळदा, कवळीथ, भोरटेक, ओझर्टा, श्रीखेड या परिसरातील गोमाई नदीसोबत उमरी व खापरी नदीवरदेखील बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या साखळी बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार आहे.

मार्च २०१७ मध्ये आम्ही निवेदन सादर केले होते. आज आम्हाला मनस्वी आनंद होतो की आमच्या मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर होऊन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होऊन ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या धरणांचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

-डॉ. किशोर पाटील, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा