शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गोमाई नदीवरील साखळी बंधाऱ्याच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ...

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ७ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिले होते. उन्हाळाच्या सुरुवातीलाच शहादा तालुक्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी जाणवत आहे. यात गोमाई नदीवर मध्य प्रदेश सिमेत मोठा बंधारा बांधला गेल्याने हे पाणी मध्य प्रदेशातच अडविले गेले आहे. त्यामुळे गोमाई नदीचे महाराष्ट्रातील पात्र हे कोरडेच आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर व जनावरांना बसला आहे. भविष्यात नदीलगतच्या गावांना प्रचंड पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून गोमाई नदीवर काही ठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधून नदी पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शहाद्याचे तत्कालीन प्रांताधिकारी साताळकर यांना गोमाई नदीविषयी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.

नदीचे पाणी वाहून जाऊ नये व शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या भागातील गोगापूर, दामळदा, कवळीथ, भोरटेक, ओझर्टा, श्रीखेड या परिसरातील गोमाई नदीसोबत उमरी व खापरी नदीवरदेखील बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या साखळी बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार आहे.

मार्च २०१७ मध्ये आम्ही निवेदन सादर केले होते. आज आम्हाला मनस्वी आनंद होतो की आमच्या मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर होऊन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होऊन ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या धरणांचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

-डॉ. किशोर पाटील, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा