शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

गोमाई नदीवरील साखळी बंधाऱ्याच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ...

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ७ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिले होते. उन्हाळाच्या सुरुवातीलाच शहादा तालुक्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी जाणवत आहे. यात गोमाई नदीवर मध्य प्रदेश सिमेत मोठा बंधारा बांधला गेल्याने हे पाणी मध्य प्रदेशातच अडविले गेले आहे. त्यामुळे गोमाई नदीचे महाराष्ट्रातील पात्र हे कोरडेच आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर व जनावरांना बसला आहे. भविष्यात नदीलगतच्या गावांना प्रचंड पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून गोमाई नदीवर काही ठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधून नदी पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शहाद्याचे तत्कालीन प्रांताधिकारी साताळकर यांना गोमाई नदीविषयी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.

नदीचे पाणी वाहून जाऊ नये व शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या भागातील गोगापूर, दामळदा, कवळीथ, भोरटेक, ओझर्टा, श्रीखेड या परिसरातील गोमाई नदीसोबत उमरी व खापरी नदीवरदेखील बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या साखळी बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार आहे.

मार्च २०१७ मध्ये आम्ही निवेदन सादर केले होते. आज आम्हाला मनस्वी आनंद होतो की आमच्या मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर होऊन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होऊन ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या धरणांचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

-डॉ. किशोर पाटील, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा