शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात स्वच्छ भारतचा निधी पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:43 IST

तळोदा : तालुक्याच्या ग्रामीण भागासह दुर्गम, अतिदुर्गम भागात स्वछ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या वापराविषयी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांमध्ये ...

तळोदा : तालुक्याच्या ग्रामीण भागासह दुर्गम, अतिदुर्गम भागात स्वछ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या शौचालयाच्या वापराविषयी मोठय़ा प्रमाणावर नागरिकांमध्ये उदासीनता दिसून येत असून, शौचालय वापराअभावी लाखोंचा निधी पाण्यात गेल्याचे चित्र आहे. तळोदा तालुक्यात सन 2017-18 मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत 6 कोटी कोटी 42 लाख 72 हजार एवढा निधी उपलब्ध झाला होता. त्यातून तालुक्यात पाच हजार 356 शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. प्रशासनाकडून शौचालय बांधणीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. वर्षभरात शौचालय बांधणीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असला तरी त्याची उपयुक्तता अत्यल्प प्रमाणात  असल्याचे निदर्शनात येते.आजही नागरिक मोठय़ा प्रमाणावर उघडय़ावर शौचास जाताना दिसून येतात. शौचालयाचा वापर करण्याऐवजी हजारो रुपये खचरून उभारण्यात आलेले शौचालयाये ही बंदावस्थेत आहेत तर काही ठिकाणी शौचालयांमध्ये काही तरी साहित्य भरलेले आढळून अनेक शौचालयांचे काम हे अपूर्णा अवस्थेत असून, अनेक शौचालयांच्या टाक्यांचे बांधकामच केले गेले नसल्याची स्थिती आहे. नुसते अनुदान काढण्यासाठी शौचालयास बांधकामपूर्ण दाखवण्यात येते प्रत्यक्षात मात्र शौचालयांचे काम अपूर्ण असते व त्याचा वापर केला जात नसल्याचे ही सांगण्यात येते. त्यामुळे पंचायत समितीकडून सांगण्यात येत असणा:या उद्दिष्टपूर्तीची फलश्रुती असल्याचे फोल ठरत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेबाबत सुधारित धोरण आणि पर्याप्तेच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी त्यांनी 2 ऑक्टोबर 2014 पासून भारत सरकारच्या वतीने स्वच्छ भारत मिशन राबविण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 र्पयत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून 2 ऑक्टोबर 2019 र्पयत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हागणदरी मुक्तीच्या कार्यक्रमातील जुन्या उणिवा दूर करुन तो प्रभावीपणे राबविणे, शाश्वत स्वच्छतेच्या साधनांचा प्रसार  करणा:या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षणाव्दारे प्रेरित करणे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, ही या अभियानाची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहे. पण तळोदा तालुक्यातील सद्य:स्थिती बघता प्रशासनकडून येत्या वर्षभरात कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत मिशनचा कालावधी पूर्ण होण्यासाठी आता केवळ आठ ते दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे, असे असताना या अभियानाला अधिक गती देणे गरजेचे आहे. त्यासाठी पंचायत समिती प्रशासन व स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधनाची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शौचालय बांधकाम अनुदानाचा लाभ लाभाथ्र्याना देण्यात येत असताना त्याला शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असणा:या या योजनेची व उद्दिष्टांची जाणीव करून दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष  प्रय} होणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन गावागावांमध्ये जावून शौचालय वापराबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याची गरज आहे. पंचायत समिती प्रशासनाने कागदी उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याऐवजी स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती करुन जनजागृतीपर उपक्रम राबवत तळोदा तालुक्याच्या विविध भागातील नागरिकांना शौचालयांचा वापर करण्यासाठी प्रेरित करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े