शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST

ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी नंदुरबार : तालुक्यातील धानोरा मार्गावर बसेस सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. या मार्गातील ...

ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील धानोरा मार्गावर बसेस सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. या मार्गातील गावांमध्ये बस जात नसल्याने नागरिक खासगी वाहनातून प्रवास करत आहेत. या वाहनांमध्ये जागा नसल्याने गाडीमागे लटकून प्रवास होत असल्याचे दिसून येत आहे.

पालिकेने तपासणी करण्याची गरज

नंदुरबार : शहरात अनलाॅकमुळे विवाह सोहळे तसेच घरगुती समारंभ मर्यादित नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा होत आहेत. यातून काही ठिकाणी अद्यापही वर्दळ वाढली आहे. दरम्यान, यासाठी गल्लोगल्ली तसेच रस्त्यांवर मंडप टाकण्यात येत आहेत. टाकलेल्या पेंडाॅलसाठी नागरिकांकडून परवानगी घेतली किंवा कसे हे पालिकेने तपासण्याची गरज आहे. तीन ते चार दिवस राहणाऱ्या पेंडाॅलमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.

शनिवारी कोथिंबीरचे दर पुन्हा घसरले

नंदुरबार : बाजारपेठेत शनिवारी कोथिंबीरीचे दर घसरल्याचे दिसून आले होते. यातून १० रुपयात कोथिंबीरीच्या तीन जुड्या देण्याची तयारी किरकोळ विक्रेते दर्शवत होते. बाजारात गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरीची मुबलक आवक होत असल्याने दर घसरत आहे.

दुर्गम भागात दमदार पावसाची प्रतीक्षा

धडगाव : तालुक्यातील विविध भागात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. यातून शेतकरी बियाणे पेरणीसाठी खोळंबले आहेत. जमिनीची वाफ होण्याएवढा पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांना अद्यापही सुरुवात झालेली नसल्याची माहिती दिली गेली आहे.

सराफ बाजारात ग्रामीण भागातून गर्दी

नंदुरबार : खरीप हंगाम सुरू झाला असल्याने शेतशिवारात पेरणीसाठी लागणारे विविध साहित्य खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामासह गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक येऊनही त्याची योग्य पद्धतीने विक्री न झाल्याने शेतकरी आर्थिक चणचणीत आहेत. यातून साहित्य खरेदीसाठी सोने व चांदीचे दागिने गहाण ठेवत वेळ भागवण्याची तयारी त्यांच्याकडून ठेवली जात आहे.

नाशिक मार्गावरील बसेसमध्ये गर्दी कमी

नंदुरबार : शहरातून नाशिकसाठी दिवसभरात १४ पेक्षा अधिक फेऱ्या सध्या होत आहेत. साक्री-पिंपळनेर मार्गाने ह्या फेऱ्या होत आहेत. परंतु प्रवासी ह्या फेऱ्यांना पसंती देत नसल्याचे चित्र आहे. पिंपळनेर ते सटाणा दरम्यान रस्ता खराब असल्याने गर्दी कमी होत आहे.

ग्रामीण हद्दीतील नागरिकांचे हाल

नंदुरबार : शहर व परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. रिमझिम पाऊस सुरू आहे. यातूनही ग्रामीण हद्दीतील रस्ते चिखलमय होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आतापासूनच हाल सुरू झाले असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे.

लाॅकडाऊनच्या निर्णयाने चिंता

नंदुरबार : जिल्ह्यात सायंकाळी चारपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने रस्त्यालगत विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक चिंतेत आहेत. वेळेआधीच व्यवसाय आटोपावा लागणार असल्याने रोजगारावर परिणाम होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मोड परिसरात बिबट्याचा संचार

बोरद : तळोदा तालुक्यातील मोड, मोहिदा व कळमसरे परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळी बिबट्या दिसून येत असल्याचे शेतकरी व मजूर सांगत आहेत. वनविभागाने याकडे लक्ष द्यावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.