शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी काळजी घेऊन उत्सव करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर आल्याने नागरीकांनी काळजी घेऊनच आगामी गणेशोत्सव साजरे केले पाहिजेत असे भावनिक आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले. नवापूर पोलीस ठाण्यातर्फे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते़पालिकेच्या बहुउद्देशील नगरभवनात ही बैठक पार पडली़ बैठकीस आमदार शिरीष नाईक, लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार सुनिता जºहाड, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, वीज कंपनीचे उप विभागीय अभियंता सचिन माळी उपस्थित होते. प्रारंभी मोहरम व गणपती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाची नियमावली व सूचनांचे वाचन रमेश पवार यांनी केले. प्रास्ताविकपोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी करुन उपाययोजना, प्रतिबंधात्मक कारवाई व गणेश स्थापनेविषयीची माहिती दिली.मंडळाच्या सदस्यांनी मांडलेल्या अडचणी व केलेल्या मागण्यांसदर्भात पोलीस अधिक्षक पंडीत यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार फूट आणि घरगुती स्तरावर दोन फूट उंच मूर्तीची स्थापना करावी, पालिकेकडुन विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असून तेथेच विसर्जन करावे व शक्यतो घरात उपलब्ध धातूच्या मुर्तीची प्रतिकात्मक स्थापना करुन घरीच विसर्जन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीत मंगेश येवले, निलमकुमार पाठक, हसमुख पाटील, अमृत लोहार, किरण टिभे यांनी सहभाग घेत सूचना व मागण्या मांडून मत मांडले़ सूत्रसंचलन प्रा.आय. जी. पठाण यांनी तर सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी आभार मानले. बैठकीत शहरातील मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व शांतता कमिटीचे सभासद हजर होते.बैठकीत आमदार शिरीष नाईक यांनी शहर व तालुक्यास शांतताप्रिय असा वारसा लाभला असून सर्व धार्मिक सण व उत्सव समाजातील सर्व घटक एकत्र येउन गुण्या गोविंदाने साजरा करीत आले आहेत असे सांगितले. कोरोनामुळे सार्वजनिक सण उत्सव चाकोरीबध्द पध्दतीने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहर व तालुक्यात बाधीतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत. स्वत:ची काळजी घेणे हाच उपाय असल्याने आगामी सण उत्सव घरगुती स्तरावर कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने साजरे करुन नवापुरची राज्य व देशातील ओळख कायम ठेवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.