शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा केवळ राजकीय ठरू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:47 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोनवेळा विविध कारणांनी स्थगित झालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अखेर गुरुवारी जिल्ह्यात ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोनवेळा विविध कारणांनी स्थगित झालेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अखेर गुरुवारी जिल्ह्यात येत असून या यात्रेनिमित्ताने जिल्हावासीयांच्या अनेक अपेक्षा लागून आहेत. विशेषत: गेल्या चार, साडेचार वर्षात नजरेस भरेल असा एकही विकास प्रकल्प कार्यान्वीत न झाल्याने किमान संथपणे सुरू असलेल्या योजनांना तरी अंतिम टप्प्यात गती मिळावी असा सूर जनमानसातून व्यक्त होत आहे.  महाजनादेश यात्रेनिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्ह्यात येत आहेत. पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार त्यांचा शहादा दौरा रद्द झाला असला तरी नंदुरबारला सभा होत असल्याने भाजप कार्यकत्र्यासह जिल्हावासीयांमध्येही उत्सूकता लागून आहे. यापूर्वी मुख्यमंत्री गेल्या चार वर्षात चार ते पाच वेळा जिल्ह्यात आले. चेतक फेस्टीव्हलमध्ये घोडय़ावर रपेटही घेतली तर दुर्गम भागात जावून आदिवासींच्या आरोग्याची काळजीही वाहिली. मात्र विकासाबाबत जिल्ह्याच्या पदरी फार काही मिळाले अशी स्थित नाही. जिल्ह्याला मंत्रीपदच न मिळाल्यामुळे येथील प्रश्नांना फारसा पाठपुरावा झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच वर्षी बंद पडलेल्या उपसा सिंचन योजनांसाठी 41 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. मात्र चार वर्षानंतर योजनांची कामे सुरू झाली पण जी कामे केवळ सहा महिने कालावधीची होती ती तीन वर्ष उलटूनही पुर्ण झालेली नाही. आरोग्य मेळाव्यात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करून प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचे जाहीर केले, परंतु अजूनही वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या फे:यातच अडकले आहे. औद्योगिक वसाहतीबाबतही घोषणा झाली. मात्र अजूनही कामे अर्धवटच आहे. चिलीपार्क, टेक्स्टाईल पार्क हवेतच विरले. नर्मदेचे 11 टीएमसी पाणी आणण्याबाबत कुठल्याही हालचाली नाहीत. एकीकडे विकासाचे प्रश्न रखडले असतांना यंदाचा अतिवृष्टीचा मोठा फटका  जिल्हावासीयांना बसला आहे. एक हजारापेक्षा अधीक घरांची पडझड झाली आहे. तर 30 हजार हेक्टरपेक्षा अधीक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी या नुकसानग्रस्तांसाठी घोषणा केली असली तरी निरपेक्ष पंचनामे होणे अपेक्षीत आहे. अनेक शेतक:यांचा शेतातील पिकेच नव्हे तर पुर्ण शेतीच वाहून गेली. त्यांना विचारपूस करण्यासाठी कुठला सरकारी अधिकारी अथवा कर्मचारी त्यांच्यार्पयत पोहचलेला नाही.  जिल्ह्यात पुरामुळे नदीकाठावरील असंख्य शेतक:यांची पुर्ण शेतीच वाहून गेली आहे. त्यांना मात्र नुकसानीचा वेगळा निकष लावून मदतीची रक्कम वाढविण्याची गरज आहे. सरकारी मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक पूल व रस्ते त्यात वाहून गेले. त्याचे बांधकाम विभागाला अतिवृष्टीचे निमित्त मिळाले आहे. प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचे कामेही तेवढीच दोषी असल्याने या कामांचे ऑडीट होऊन चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे अनेक महत्वाचे निर्णय अथवा संकेत मिळावे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून या दौ:यात जिल्हावासीयांना लागून आहे. त्यांचा या सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा दौरा राहणार असल्याने तो केवळ राजकीय न ठरता जिल्हावासीयांच्या वेदनाही हलक्या करणारा ठरावा.