लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी सांगितले, मागील दोन ते तीन वर्षातील वातावरण बदलाचा अभ्यास केला असता फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यता असते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकºयांनी पक्व झालेली पिके, ज्वारी, हरभरा, गहू इत्यादींची काढणी करून घ्यावी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढलेली पिके पावसापासून संरक्षण होण्याच्यादृष्टीने योग्यरित्या झाकून ठेवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन.पाटील यांनी केले.
पुढील आठवड्यात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 1:38 PM