शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कौलांअभावी प्रकल्प बाधित करताय तीव्र उन्हाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:51 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांसाठी गेल्या वर्षी तालुक्यातील मोड जवळ ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांसाठी गेल्या वर्षी तालुक्यातील मोड जवळ वसाहत स्थापन करण्यात आली आह़े साधारणत: 35 कुटुंबांचे तेथे स्थलांतर  करण्यात आले आह़े त्यापैकी 11 कुटुंबाना संबंधित यंत्रणेने अजूनही छतावरील कौले पुरवलेली नाहीत़ त्यामुळे 42 अंशाच्या तापमानात संबंधित कुटुंबिय उघडय़ावर राहत आहेत़ नुतन जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करुन त्यांना कौले पुरवावीत अन् बेजबाबदार अधिका:यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी विस्थापितांकडून करण्यात येत आह़े सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या नर्मदाकाठावरील 134 कुटुंबाचे तळोदा तालुक्यातील मोड जवळील वसाहतीत स्थलांतर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आह़े गेल्या वर्षी चिमळखेडी, उलेल, धनखेडी, सिंदूरी, गमन येथील 35 कुटुंबाना तेथे आणण्यात आले आह़े प्रशासनाने त्यांच्या घराचे संपूर्ण साहित्य स्थलांतरीत वसाहतीत आणले आह़े तथापि त्यातील अकरा कुटुंबाना अजूनही घराच्या छतावर टाकण्यासाठी कौले दिलेली नाहीत़ त्यामुळे या कुटुंबियांची मोठी गैरसोय होतेय़ त्याच बरोबर संपूर्ण वसाहतीत वीजखांब, तारा ओढून, ट्रान्सफार्मरदेखील बसविण्यात आला आह़े परंतु जोडणीअभावी बाधितांना अंधारातच रहावे लागत आह़े वास्तविक नर्मदा अवार्ड प्रमाणे प्रकल्पातून स्थलातरीत करण्यात आलेल्या वसाहतींमधील विस्थापितांना सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित नर्मदा विकास व सरदार सरोवर विभागाची आह़े मात्र सदर यंत्रणांनी याबाबत उदासिन भुमिका घेतल्याचा आरोप आह़ेवसाहत धारकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा विकास विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत तीन हातपंप करुन देण्यात आले आहेत़ त्यापैकी एकच हातपंप सुरु आहेत, तर उर्वरीत दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत़ तेथील कुटुंबाना एकच हात पंपाच्या आधार घ्यावा लागत आह़े तोही पाणी खोलवर गेल्यामुळे कमीत कमी पाणी निघत असत़े वास्तविक नादुरुस्त हातपंप दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना संबंधित यंत्रणा तेवढीही तसदी घ्यायला तयार नाही़ या शिवाय वसाहतीत पाण्याची टाकी बसविण्यात आली आह़े मात्र बाधितांना नळजोडणी करण्यात आलेली नाही़ सरदार सरोवर प्रकल्प व नर्मदा विकास विभाग या दोन्ही यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आह़े