शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

कौलांअभावी प्रकल्प बाधित करताय तीव्र उन्हाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 18:51 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांसाठी गेल्या वर्षी तालुक्यातील मोड जवळ ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापितांसाठी गेल्या वर्षी तालुक्यातील मोड जवळ वसाहत स्थापन करण्यात आली आह़े साधारणत: 35 कुटुंबांचे तेथे स्थलांतर  करण्यात आले आह़े त्यापैकी 11 कुटुंबाना संबंधित यंत्रणेने अजूनही छतावरील कौले पुरवलेली नाहीत़ त्यामुळे 42 अंशाच्या तापमानात संबंधित कुटुंबिय उघडय़ावर राहत आहेत़ नुतन जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करुन त्यांना कौले पुरवावीत अन् बेजबाबदार अधिका:यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा अशी मागणी विस्थापितांकडून करण्यात येत आह़े सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या नर्मदाकाठावरील 134 कुटुंबाचे तळोदा तालुक्यातील मोड जवळील वसाहतीत स्थलांतर करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आह़े गेल्या वर्षी चिमळखेडी, उलेल, धनखेडी, सिंदूरी, गमन येथील 35 कुटुंबाना तेथे आणण्यात आले आह़े प्रशासनाने त्यांच्या घराचे संपूर्ण साहित्य स्थलांतरीत वसाहतीत आणले आह़े तथापि त्यातील अकरा कुटुंबाना अजूनही घराच्या छतावर टाकण्यासाठी कौले दिलेली नाहीत़ त्यामुळे या कुटुंबियांची मोठी गैरसोय होतेय़ त्याच बरोबर संपूर्ण वसाहतीत वीजखांब, तारा ओढून, ट्रान्सफार्मरदेखील बसविण्यात आला आह़े परंतु जोडणीअभावी बाधितांना अंधारातच रहावे लागत आह़े वास्तविक नर्मदा अवार्ड प्रमाणे प्रकल्पातून स्थलातरीत करण्यात आलेल्या वसाहतींमधील विस्थापितांना सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित नर्मदा विकास व सरदार सरोवर विभागाची आह़े मात्र सदर यंत्रणांनी याबाबत उदासिन भुमिका घेतल्याचा आरोप आह़ेवसाहत धारकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी नर्मदा विकास विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फत तीन हातपंप करुन देण्यात आले आहेत़ त्यापैकी एकच हातपंप सुरु आहेत, तर उर्वरीत दोघे गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहेत़ तेथील कुटुंबाना एकच हात पंपाच्या आधार घ्यावा लागत आह़े तोही पाणी खोलवर गेल्यामुळे कमीत कमी पाणी निघत असत़े वास्तविक नादुरुस्त हातपंप दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना संबंधित यंत्रणा तेवढीही तसदी घ्यायला तयार नाही़ या शिवाय वसाहतीत पाण्याची टाकी बसविण्यात आली आह़े मात्र बाधितांना नळजोडणी करण्यात आलेली नाही़ सरदार सरोवर प्रकल्प व नर्मदा विकास विभाग या दोन्ही यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच प्रकल्पग्रस्तांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप आह़े