शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबारमधून- नाना पटोले

By भूषण.विजय.रामराजे | Updated: October 29, 2023 19:22 IST

यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरकारने संविधानावर चालून देश उभा केला आहे.

नंदुरबार : आदिवासी या देशाचे मूलनिवासी आहेत. या मूलनिवासींच्या भूमीतून अर्थात नंदुरबार येथून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मानस आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबारमध्ये केले. रविवारी नंदुरबारमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरकारने संविधानावर चालून देश उभा केला आहे. १९५२ च्या निवडणुकीपासून २०१४ पर्यंत नंदुरबारमध्ये काॅंग्रेसचा खासदार निवडून आला आहे. हीच परंपरा पुढे कायम ठेवायची आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गांधी घराण्यातील नेत्यांना नंदुरबारमध्ये आणायचे आहे. येत्या डिसेंबरमध्ये आपण पुन्हा नंदुरबारमध्ये येणार आहोत. त्यावेळी तसे नियोजन करणार आहोत.यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी काॅंग्रेसकडे काही संभाव्य नावे असल्याचेही सूतोवाच केले आहे.बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कामकाजावर टीका केली. यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने फटकारणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब असल्याचे सांगितले.

सुप्रीम कोर्टाने मर्यादा देऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी उल्लंघन केले. दर्जेदार आणि चांगल्या संसदीय कामकाजासाठी महाराष्ट्र विधिमंडळ हे देशात ओळखले जाते. यात राहुल नार्वेकर व भाजपकडून असंसदीय पद्धतीने सुरू असलेले कामकाज विधिमंडळाच्या नावावर बट्टा लावणारे आहे. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. यातून विमा कंपन्यांनी परतावा देणे आवश्यक होते. परंतु, राज्य शासन विमा कंपन्यांना कोणत्याही प्रकारे आदेश देत नाही. या सर्व विमा कंपन्यांसोबत भाजपचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देश आणि राज्यात महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. केंद्राने विशेष अधिवेशन बोलावून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे आरक्षण महिलांना प्रत्यक्ष कधी मिळेल, याचा कायदा २०२५ मध्ये होणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले