शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शुभारंभ नंदुरबारमधून- नाना पटोले

By भूषण.विजय.रामराजे | Updated: October 29, 2023 19:22 IST

यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरकारने संविधानावर चालून देश उभा केला आहे.

नंदुरबार : आदिवासी या देशाचे मूलनिवासी आहेत. या मूलनिवासींच्या भूमीतून अर्थात नंदुरबार येथून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्याचा मानस आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा घेण्याचे नियोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबारमध्ये केले. रविवारी नंदुरबारमध्ये पार पडलेल्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले की, काँग्रेसच्या सरकारने संविधानावर चालून देश उभा केला आहे. १९५२ च्या निवडणुकीपासून २०१४ पर्यंत नंदुरबारमध्ये काॅंग्रेसचा खासदार निवडून आला आहे. हीच परंपरा पुढे कायम ठेवायची आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गांधी घराण्यातील नेत्यांना नंदुरबारमध्ये आणायचे आहे. येत्या डिसेंबरमध्ये आपण पुन्हा नंदुरबारमध्ये येणार आहोत. त्यावेळी तसे नियोजन करणार आहोत.यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी काॅंग्रेसकडे काही संभाव्य नावे असल्याचेही सूतोवाच केले आहे.बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कामकाजावर टीका केली. यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाने फटकारणे ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब असल्याचे सांगितले.

सुप्रीम कोर्टाने मर्यादा देऊन विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी उल्लंघन केले. दर्जेदार आणि चांगल्या संसदीय कामकाजासाठी महाराष्ट्र विधिमंडळ हे देशात ओळखले जाते. यात राहुल नार्वेकर व भाजपकडून असंसदीय पद्धतीने सुरू असलेले कामकाज विधिमंडळाच्या नावावर बट्टा लावणारे आहे. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. यातून विमा कंपन्यांनी परतावा देणे आवश्यक होते. परंतु, राज्य शासन विमा कंपन्यांना कोणत्याही प्रकारे आदेश देत नाही. या सर्व विमा कंपन्यांसोबत भाजपचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. देश आणि राज्यात महागाई, बेरोजगारी, महिलांवरचे अत्याचार वाढले आहेत. केंद्राने विशेष अधिवेशन बोलावून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे आरक्षण महिलांना प्रत्यक्ष कधी मिळेल, याचा कायदा २०२५ मध्ये होणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले