शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नंदुरबारमधील व्यापाऱ्याला मुंबईच्या तिघांनी ८९ लाखांना फसविले, गुन्हा दाखल

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: May 20, 2023 19:12 IST

नंदुरबार उपनगर पोलिसात २०मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मनोज शेलार, नंदुरबार : व्यापाऱ्याचा विश्वास संपादन करून मुंबईतील तिघांनी ८९ लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार नंदुरबारात घडला. याप्रकरणी तिघांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसात २०मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारमधील पळाशी शिवारात असलेल्या श्री रामदेवजी ॲग्रो प्रोडक्टसच्या कारखान्याचे मालक शिरीष नारायण अग्रवाल (वय ४५, रा. परशुराम चौक, नंदुरबार) यांच्याकडे २२ मार्च ते २० एप्रिल यादरम्यान वेळोवेळी येऊन भिवंडी येथील जेजे प्रोडक्टसचे रवी किशोरभाई पावून, आशा रवी पावून, सचिन किशोरभाई पावून (सर्व रा.मिरा भाईंदर, मुंबई) यांनी ८९ लाख दोन हजार २३५ रुपये किमतीचा गहू व हरभरा विकत घेतला. त्याची पोहोच देखील केली. परंतु त्याचे पैसे त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यावर शिरीष अग्रवाल यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरिक्षक दिनेश भदाणे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी