शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टरचे वनक्षेत्र जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक ...

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून मंगळवारी सकाळी आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार २५० हेक्टरवर लागवड करण्यात आलेले बांबू रोपवन, सागाची झाडे, गवत आणि ५० हेक्टरवरची पूर्ण क्षमतेने वाढलेली खैरची झाडे आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल व वनरक्षक हे रात्रीपासून या परिसरात होते. सकाळी आग आटोक्यात आल्यानंतर ठाणेपाडा रोपवाटिकेच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात आगीचे पंचनामे करण्यात आले. यात सायंकाळपर्यंत पथकांना केवळ १४ हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचता आले होते. बुधवारी उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत ठाणेपाडा गावाच्या परिसरात शेकडो हेक्टरवर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ही आग लागली होती. ठाणेपाडा गावातील ग्रामस्थांना प्रारंभी वणवा पेटल्याचे दिसून आले. काही वेळात ही आग वाढून साक्री ते नंदुरबार रस्त्याच्या दुतर्फा पोहोचली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती ते दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी आग आटोक्यात आली.

या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत. हे सर्व प्राणी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासून या भागात पंचनामे करत आहेत. दरम्यान, एका मोराला आगीची झळ बसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आगीत खाक झालेले बांबू व खैर झाडांचे रोपवन वनविभागाचा अनोखा प्रकल्प होता. यातील गवताची उंची ही पाच फुटांपेक्षा अधिक होती. तसेच सागाची पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाची झाडेही आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, आग लागली किंवा लावली गेली याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.