शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

ठाणेपाडा शिवारातील ३०० हेक्टरचे वनक्षेत्र जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक ...

सोमवारी रात्री लागलेल्या आगीच्या घटनेनंतर वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. वनविभागाचे अधिकारी व ठाणेपाडा ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमातून मंगळवारी सकाळी आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. दरम्यान, प्राथमिक अहवालानुसार २५० हेक्टरवर लागवड करण्यात आलेले बांबू रोपवन, सागाची झाडे, गवत आणि ५० हेक्टरवरची पूर्ण क्षमतेने वाढलेली खैरची झाडे आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह वनपाल व वनरक्षक हे रात्रीपासून या परिसरात होते. सकाळी आग आटोक्यात आल्यानंतर ठाणेपाडा रोपवाटिकेच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात आगीचे पंचनामे करण्यात आले. यात सायंकाळपर्यंत पथकांना केवळ १४ हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचता आले होते. बुधवारी उर्वरित ठिकाणी पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार ते साक्री रस्त्यालगत ठाणेपाडा गावाच्या परिसरात शेकडो हेक्टरवर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. या ठिकाणी ही आग लागली होती. ठाणेपाडा गावातील ग्रामस्थांना प्रारंभी वणवा पेटल्याचे दिसून आले. काही वेळात ही आग वाढून साक्री ते नंदुरबार रस्त्याच्या दुतर्फा पोहोचली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती ते दाखल झाले होते. वनविभागाचे कर्मचारी व ठाणेपाडा गावातील ग्रामस्थ यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु करण्यात आले होते. सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सकाळी आग आटोक्यात आली.

या जंगलात दोन बिबट, काळवीट, सायाळ आणि ५०० पेक्षा अधिक मोर आहेत. हे सर्व प्राणी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली असून वनविभागाचे अधिकारी सकाळपासून या भागात पंचनामे करत आहेत. दरम्यान, एका मोराला आगीची झळ बसल्याची माहिती देण्यात आली आहे.

आगीत खाक झालेले बांबू व खैर झाडांचे रोपवन वनविभागाचा अनोखा प्रकल्प होता. यातील गवताची उंची ही पाच फुटांपेक्षा अधिक होती. तसेच सागाची पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाची झाडेही आगीत जळून खाक झाली आहेत.

दरम्यान, आग लागली किंवा लावली गेली याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.