शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

बीएसएनएलची सेवा 15 दिवसांपासून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:34 PM

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : अक्कलकुवा तालुक्यात बीएसएनएल सेवा गेल्या 15 दिवसांपासून बंद झाली असून त्यामुळे या सेवेवर अवलंबून असलेली ब्रॉडबँड सेवा बंद असल्याने बँकेच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. मोबाईल सेवेसह दूरध्वनी सेवाही ठप्प झाल्याने तालुक्यातील जनतेचा जगाशी संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.अक्कलकुवा तालुक्यात एक हजारावर बीएसएनएलचे दूरध्वनी ग्राहक आहेत त्यातील बहुसंख्य ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा घेतली आहे. गेल्या 15 दिवसांपासून ही सेवा पूर्णत: बंद असल्याने त्यांचे व्यवसाय पूर्णत: बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.  बीएसएनएलच्या कनेक्टीव्हीटीअभावी स्टेट बँक, सेंट्रल बैंक, जिल्हा मध्यवर्ती बँक, टपाल कार्यालय, सायबर सेवा आदींचे कामकाज ठप्प पडल्यामुळे जनतेच्या अत्यावश्यक गरजा प्रभावित झाल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजनांची माहिती, विद्यार्थी पोर्टलवरील माहिती भरणे या सर्व गोष्टींवर परिणाम झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने जनतेत या विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचे हालशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व विविध शासकीय दाखले ऑनलाईन मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खापर किंवा अक्कलकुवा येथे येतात. मात्र कनेक्टीव्हीटीअभावी कामे होत नसल्याने त्यांना दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना प्रवासाचा आर्थिक भारही सहन करावा लागत आहे.अक्कलकुवा येथील कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी रहात नसल्याने तक्रार कोणाकडे करावी हा कायमचा प्रश्न आहे. ब:याचा           तळोदा कार्यालयात तक्रार करावी लागते. त्याचप्रमाणे अक्कलकुवा, खापर व मोलगी येथील ऑपरेटर नसल्याने तेथे तात्पुरते नेमण्यात आलेले अकुशल कामगारांना दूरध्वनीचा बिघाड दुरूस्त करणे जमत नाही. त्यामुळे ग्राहकांची परवड होत आहे. त्या ऑपरेटर्सना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळेही सेवेत व्यतय येत असल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यात विजेचा लपंडाव हा नेहमीचा असून तास दोन तास वीजपुरवठा बंद पडल्यास बीएसएनएलची सेवा बंद पडते. बॅटरी रिचार्ज करण्यासाठी असलेल्या जनरेटरचा वापर केला जात नसून जनरेटर केवळ ‘शो-पीस’ झालेले आहेत. त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत असून 15 दिवसांपासून सेवा बंद असूनही वरिष्ठ लक्ष देत नसल्याने जनतेने तक्रार कुठे           करावी? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत असून वरिष्ठांनी लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.