शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती व बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयासह इतर धडाकेबाज निर्णय पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत घेतल्याने निश्चितच त्यांचा अशा विकासाच्या व्हिजनाने तालुक्यातील ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अन्यथा ‘नव्याची नवलाई’ अशी म्हण ठरू नये.तळोदा पंचायत समितीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन पदाधिकारी व अधिकाºयांची पहिलीच मासीक सभा घेण्यात आली. एक-दोन सदस्य वगळता सर्वच सदस्य नवीन आहेत. त्यामुळेते अनुभवी आहेत. त्यातही त्यातील बहुतेक जण तरूण आहेत. साहजिकच त्यांच्या कामगिरीबाबत ग्रामीण जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र या पदाधिकाºयांनी पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली आहे. कारण बैठकीत गतीमान प्रशासनासाठी कर्मचाºयांची बायोमेट्रीक हजेरी, पंचायत समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, ग्रामविकास आराखड्यासाठी अधिकाºयांचा समन्वय, विभाग प्रमुखांची सक्तीची उपस्थिती, कागदी घोड्याऐवजी कामांची प्रत्यक्ष कृती, कामचुकारांवर कारवाई अशा वेगवेगळ्या निर्णयांबरोबरच आदिवासी विकास प्रकल्पांच्या योजनांच्या आढाव्यासाठी तेथील अधिकाºयांना बैठकीस सक्ती करून असे धोरणात्मक विषय घेण्यात आले.साहजिकच पदाधिकाºयांच्या या निर्णयाने तालुक्यातील ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तथापि त्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे. कारण लाभार्थ्यांना विविध योजनांच्या कामांसाठी सतत हेलपाटे मारावे लागत असल्याचा वाईट अनुभव आहे. कर्मचारी कार्यालयात टेबलावर सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यांना शोधण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याच्या प्रकारालाही तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. आता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीक हजेरी यामुळे निश्चितच कामचुकारपणा दूर होऊन प्रशासनात गतीमानता येवून लोकांची कामे होतील. विशेषत: आदिवासी प्रकल्पाच्या योजना व अधिकाºयांमधील समन्वय यामुळे योजनांना गती येईल.या सर्व पार्श्वभूमिवर पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाºयांनी घेतलेले हे निर्णय निश्चितच तालुक्याचा विकास आणि प्रशासनातील उदासिनता दूर होण्यासाठी निश्चितच फलदायक आहे. परंतु त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा नव्याची नवलाई अशी आरूढ झालेली म्हण ठरु नये.