शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

तळोदा पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गतीमान प्रशासन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी तळोदा पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची सक्ती व बायोमेट्रीक हजेरीच्या निर्णयासह इतर धडाकेबाज निर्णय पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत घेतल्याने निश्चितच त्यांचा अशा विकासाच्या व्हिजनाने तालुक्यातील ग्रामीण जनतेमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अन्यथा ‘नव्याची नवलाई’ अशी म्हण ठरू नये.तळोदा पंचायत समितीच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन पदाधिकारी व अधिकाºयांची पहिलीच मासीक सभा घेण्यात आली. एक-दोन सदस्य वगळता सर्वच सदस्य नवीन आहेत. त्यामुळेते अनुभवी आहेत. त्यातही त्यातील बहुतेक जण तरूण आहेत. साहजिकच त्यांच्या कामगिरीबाबत ग्रामीण जनतेमध्ये मोठी उत्सुकता आहे. मात्र या पदाधिकाºयांनी पंचायत समितीच्या पहिल्याच बैठकीत धडाकेबाज निर्णय घेत आपल्या कामाची चुनूक दाखवून दिली आहे. कारण बैठकीत गतीमान प्रशासनासाठी कर्मचाºयांची बायोमेट्रीक हजेरी, पंचायत समिती परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे, ग्रामविकास आराखड्यासाठी अधिकाºयांचा समन्वय, विभाग प्रमुखांची सक्तीची उपस्थिती, कागदी घोड्याऐवजी कामांची प्रत्यक्ष कृती, कामचुकारांवर कारवाई अशा वेगवेगळ्या निर्णयांबरोबरच आदिवासी विकास प्रकल्पांच्या योजनांच्या आढाव्यासाठी तेथील अधिकाºयांना बैठकीस सक्ती करून असे धोरणात्मक विषय घेण्यात आले.साहजिकच पदाधिकाºयांच्या या निर्णयाने तालुक्यातील ग्रामीण जनतेने समाधान व्यक्त केले आहे. तथापि त्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी करण्याची अपेक्षादेखील व्यक्त केली जात आहे. कारण लाभार्थ्यांना विविध योजनांच्या कामांसाठी सतत हेलपाटे मारावे लागत असल्याचा वाईट अनुभव आहे. कर्मचारी कार्यालयात टेबलावर सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यांना शोधण्यासाठी इकडे-तिकडे भटकावे लागत असल्याच्या प्रकारालाही तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिक सांगतात. आता परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रीक हजेरी यामुळे निश्चितच कामचुकारपणा दूर होऊन प्रशासनात गतीमानता येवून लोकांची कामे होतील. विशेषत: आदिवासी प्रकल्पाच्या योजना व अधिकाºयांमधील समन्वय यामुळे योजनांना गती येईल.या सर्व पार्श्वभूमिवर पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाºयांनी घेतलेले हे निर्णय निश्चितच तालुक्याचा विकास आणि प्रशासनातील उदासिनता दूर होण्यासाठी निश्चितच फलदायक आहे. परंतु त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा नव्याची नवलाई अशी आरूढ झालेली म्हण ठरु नये.