शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सीएए लागू करून सामाजिक धुव्रीकरणाचा भाजपचा प्रयत्न- जयराम रमेश

By मनोज शेलार | Updated: March 12, 2024 14:34 IST

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

नंदुरबार : नागरिकत्व दुरूस्ती कायदा अर्थात सीएए आताच लागू करण्याचे कारण काय? नऊ वेळा सर्वोच्च न्यायालयाकडून मुदत मागण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करीत साडेचार वर्ष या कायद्याच्या नियमावली तयार करण्यात लागू शकत असतील तर भाजप सरकारचा उद्देश साफ नाही हे स्पष्ट होते असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी नंदुरबारातील पत्रकार परिषदेत केला. 

दरम्यान, रामाच्या नावावर भाजप राजकारण करीत असून कॉंग्रेस श्रीरामाचे पुजारी तर भाजप व्यापारी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त जयराम रमेश हे नंदुरबारात आले आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित होते. जयराम रमेश यांनी सांगितले, खासदार राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा ही पाच स्तंभांवर काढण्यात आली आहे. त्या स्तंभाची गॅरंटी देशाला दिली जात आहे. त्यातील दोन गॅरंटी या महाराष्ट्रातून दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत तीन न्यायांवर गॅरंटी दिली असून त्यात शेतकऱ्यांना सन्माने उभे करण्यासाठी एमएसपीला कायद्याचा दर्जा देणार. शेतकऱ्यांची कर्ज माफी करणे. सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय गणना करण्यावर भर देणे. त्यामुळे कुठल्या जातीचा देशाच्या विकासात किती टक्का हिस्सा आहे हे कळेल. शिवाय ५० टक्के आरक्षण मर्यादेवर संशोधन करून मर्यादा हटविण्यासाठी प्रयत्न करणार. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी त्यांना सन्मानाने उभे करणार. चौथी गॅरंटी ही धुळ्यातील महिला मेळाव्यात दिली जाणार आहे. नारीशक्ती न्याय गॅरंटी म्हणून ती राहील तर पाचवी गॅरंटी ही मुंबई येथील सभेत दिली जाणार असून श्रमीक न्याय गॅरंटी राहणार आहे.

पाच दिवस यात्रा महाराष्ट्रात राहणार असून या दरम्यान खासदार राहुल गांधी हे त्र्यंबकेश्वर येथे ज्योर्तीलिंगाचे दर्शन घेणार आहेत. १६ रोजी चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप होऊन १७ रोजी दुपारी कॉंग्रेसच्या घटक पक्षांची व्यापक रॅली होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय १७ तारखेनंतर होणार असून घटक पक्ष आतापर्यंतच्या चर्चेवर समाधानी असल्याचे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

दरम्यान, रामाच्या नावावर देशात राजकारण केले जात आहे. परंतु आमच्या हृदयात राम आहे. आम्ही रामाचे पुजारी आहे तर जे राजकारण करीत आहेत ते रामाचे व्यापारी असल्याचेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNanduraनांदूरा