शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

२० दिवसांपासून बलवंड परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

आधीच अवकाळी पावसाने बलवंड परिसरातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात राहिलेली पिके शेतकरी वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोरतलाव शिवारातील दोन ...

आधीच अवकाळी पावसाने बलवंड परिसरातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात राहिलेली पिके शेतकरी वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोरतलाव शिवारातील दोन ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने शेतक-यांच्या मागील संकटांची मालिका सुरूच आहे. गत आठवडाभरापासून नवीन ट्रान्सफाॅर्मर मिळविण्यासाठी शेतकरी वीजमंडळाच्या कार्यालयात घिरट्या घालत असून त्यांंची आर्त हाक कोणीही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, पाण्याअभावी उभी पिके डोळ्यांदेखत जळण्याच्या मार्गावर आहेत. आधीच निसर्गाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी वीजमंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे संताप व्यक्त करीत आहे. आधी वीजबिल भरा, मग ट्रान्सफाॅर्मर मिळेल, या वीजमंडळाच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा एकदा कचाट्यात सापडला असून आम्हास कोणीही वाली उरला नाही, अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत ट्रान्सफाॅर्मर बदलून मिळाला नाही तर नंदुरबार वीजमंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

शासनाने तीन वर्षांपासून कृषी वीजबिले देणे बंद केले आहे. म्हणून बिले भरावी, तर कशी आणि किती. आधी शेतीला २४ तास वीज द्या, मगच वीजबिल मागा.

-बाजीराव पाटील, शेतकरी, बलवंड