शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

पाण्यासाठी ग्रामस्थांचे रात्रभर जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 11:06 IST

राधेश्याम कुलथे ।  लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला ...

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपूर गावाला पाणीपुरवठा करणारी कूपनलिका आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शेतातील खाजगी कूपनलिकेतून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. मात्र दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.शहादा तालुक्यात पाणीटंचाईने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक नळ योजना कूचकामी ठरल्या असून बंधारे, गाव तलाव आटले आहेत. संपूर्ण तालुक्यात ही परिस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर ग्रामस्थ पाणी कुठून आणतात? टंचाईच्या काळात ते दिवस कसे काढतात? प्रशासन त्यांच्या मदतीला धावले का? या सर्व प्रश्नांवर शहादा तालुक्यातील गोदीपूर येथे पाहणी केली असता या गावात सर्व कूपनलिका कोरडय़ा झालेल्या दिसून आल्या. येथील ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने रात्री नऊ वाजता गावाजवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर शेतातील वीजपुरवठा सुरू होतो. तेथे रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याठिकाणी रात्री दहा वाजेच्या सुमारास भेट दिली असता सर्व गोदीपूर गाव आजूबाजूच्या शेतात पाणी भरण्यासाठी तुटून पडलेले दिसून आले. जवळील अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात रात्री वीज आल्यावर पाण्यासाठी लगबग करावी लागते. महिला-पुरुषांसह आबालवृद्ध व लहान मुले डोक्यावर हंडे घेऊन शेताच्या दिशेने निघतात.पाण्यासाठी रात्र जागून काढल्याने अनेकवेळा दिवसा काम करणे शक्य होत नाही. परिणामी आर्थिक झळही सहन करावी लागत आहे. निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधी फक्त मते मागण्यासाठी येतात. आता ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे मात्र कोणत्याही पक्षाचा  पुढारी उपाययोजनेसाठी फिरकत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया एका वृद्ध महिलेने व्यक्त केली.  प्रशासनाने गोदीपूर येथील पाणीटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.