शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

इच्छुकांची मनधरणी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:00 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महाजनादेश यात्रेने आणि या यात्रेनिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या महाजनादेश यात्रेने आणि या यात्रेनिमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी केलेला पक्षात प्रवेश भाजपसाठी संघटनात्मकदृष्टय़ा मजबूत करणारे ठरले आहे. तथापि, त्यामुळे आगामी निवडणुकीत इच्छुकांची संख्याही वाढली असल्याने त्यांची मनधरणी करणे भाजपसाठी आव्हानच ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा गुरुवारी रात्री नंदुरबारात आली होती. रात्रीची सभा असली तरी या सभेला जिल्हाभरातून कार्यकत्र्याची झालेली गर्दी पक्षासाठी आशादायी चित्र निर्माण करणारी होती. याच सभेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, अक्राणी मतदारसंघातील गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे विजय पराडके, जि.प. सदस्य किरसिंग वसावे, आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यानी भाजपत प्रवेश केला.तसे या प्रवेशानंतरचे राजकारण पाहता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यापूर्वीदेखील डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांचा प्रवेश भाजपच्या राजकारणात फार काही बदल घडवणारा नाही. पण काँग्रेसचे कार्यकर्ते भरत गावीत व दीपक पाटील यांच्यामुळे निश्चितच भाजपला संघटनात्मक दृष्टीने फायदा होणारा आहे. हा फायदा आगामी निवडणुकीत पक्ष कशा पद्धतीने करून घेतो तो येणारा काळ ठरवेल.सद्यस्थितीत जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून त्यात नंदुरबार व शहादा-तळोदा या दोन जागा भाजपकडे आहेत तर नवापूर आणि अक्राणी या दोन जागा काँग्रेसकडे आहेत. पक्ष प्रवेशात नवापूर आणि अक्राणीच्या कार्यकत्र्याची संख्या जास्त आहे. त्यापैकी भरत गावीत यांच्या रुपाने भाजपला नवापूरमध्ये सक्षम उमेदवार मिळणार आहे. तर अक्राणीमध्ये मात्र आधीच इच्छुकांची संख्या जास्त आहे. तेथे भाजपकडून नागेश पाडवी, डॉ.नरेंद्र पाडवी हे इच्छुक आहेत. त्यात पुन्हा विजय पराडके व किरसिंग वसावे या दोघांची भर झाली आहे. तळोदा-शहाद्यातही उदेसिंग पाडवी विद्यमान आमदार आहेत. तेच स्वत: उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना भाजपने प्रवेश दिल्याने तेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. शिवाय तेथील तालुका अध्यक्ष रुपसिंग पाडवी हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे अक्राणी आणि तळोदा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाला कसरत करावी लागणार आहे.रामचंद्र पाटील व राष्ट्रवादीचे शहादा तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील या दोघांच्या प्रवेशामुळे नंदुरबार विधानसभेत पक्षाला लाभ होणार आहे. त्यापैकी ईश्वर पाटील हे यापूर्वीच डॉ.विजयकुमार गावीत यांचे समर्थक होते. पण रामचंद्र पाटील यांच्यामुळे प्रकाशा व परिसरातील काँग्रेसकडे असलेले कार्यकर्ते भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहेत.एकीकडे हे चित्र असले तरी नवीन पक्षात आलेल्या कार्यकत्र्यामुळे आधीच भाजपमध्ये असलेल्या गटातटात वाढ होणार आहे. विशेषत: शहादा तालुक्यात तीन वेगवेगळ्या दिशेतील गट आता एकत्र भाजपमध्ये राहतील तर अक्राणी-अक्कलकुवा तालुक्यातही असेच चित्र आहे. हे गट-तट मिटविणे भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जिल्हाध्यक्ष चौधरी यांचे जाहीरपणे कौतुक केल्याने त्यांना त्यांच्या कौतुकास पात्र ठरण्यासाठी कसोटीला उतरावे लागणार आहे.