शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पहिल्या टप्प्यातील विसर्जनासाठी कृत्रिम तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रात श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे विसर्जन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रात श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीवर बंदी असल्याने पहिल्या टप्प्यात घरगुती गणेश मूर्र्तींचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी पालिकेने शहरात निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी केले आहे.राज्य शासनाच्या ११ जुलैच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी आहे. उद्या पहिल्या टप्प्यातील पाचव्या दिवसाच्या गणरायांचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे विजयनगर खुले मैदान, प्रेस मारूती मैदान व गणेश नगर या तीन ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करणाºया नागरिकांनी नदीपात्रावर अथवा पाणवठ्याच्या ठिकाणी न जाता या कृत्रिम तलावात श्री गणेशाचे विसर्जन करावे.दरवर्षी विसर्जनासाठी सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपती बसवणारे नागरिक प्रकाशा येथील तापी नदी पात्रावरील घाटावर मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यावर्षी प्रकाशा ग्रामपंचायतीने गणेश विसर्जनासाठी केदारेश्वर येथील घाटावर बंदी घातली असल्याने नागरिकांनी येथे येऊ नये. त्याच प्रमाणे कृत्रिम तलावात विसर्जन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी केले आहे.दरम्यान, श्री गणेश विसर्जनासाठी नागरिकांना सोयीस्कर व्हावे यासाठी पालिका प्रशासनाने नगरपालिका इमारतीसमोर त्याचप्रमाणे डोंगरगाव रस्त्यावर पटेल रेसिडेन्सी चौकात श्री गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. याठिकाणी शहरातील विविध भागातील घरगुती गणेशोत्सव साजरा करणाºया नागरिकांनी पहिल्या टप्प्यातील विसर्जनासाठी आपल्या घरून श्री गणेश मूर्ती आणाव्यात. पालिकेमार्फत या दोन्ही केंद्रावर त्या संकलित केल्या जातील. त्याच प्रमाणे पालिकेतर्फे त्यांचे विधिवत विसर्जन केले जाईल. नागरिकांना या संकलन केंद्रापर्यंत येण्यासाठी अडचण होऊ नये याकरिता पालिका प्रशासनाने दोन संकलन रथांची निर्मिती केली असून, शहरातील विविध भागात हे रथ घरोघरी जाऊन श्रीगणेश मूर्र्तींचे संकलन करणार आहेत. या रथांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले आहे. नागरिकांनी पहिल्या टप्प्यात विसर्जन करताना कृत्रिम तलावात र्श्रींचे विसर्जन करावे. त्याचप्रमाणे ज्यांना हे शक्य नाही अशांनी पालिका प्रशासनाने कार्यान्वित केलेल्या संकलन केंद्रावर विसर्जनासाठी गणेशमूर्ती द्याव्या, असे आव्हान मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले.