शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पशुसंर्वधन आयुक्तांनीही घेतला नवापुरातील बर्ड फ्लूचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूरमध्ये दुसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूरमध्ये दुसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाययोजनांबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना सविस्तर माहिती द्यावी आणि पोल्ट्री फार्ममध्ये मार्गदर्शक सुचनेनुसार उपाययोजना होत असल्याची खात्री करावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.नवापूर येथे बर्ड फ्लूबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस. राऊतमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार उल्हास देवरे, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.सिंह म्हणाले, भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात. बाधित क्षेत्रातील अन्य पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी त्वरीत पाठवावे. नमुने पॉझिटीव्ह आल्यास बाधित क्षेत्राची नव्याने आखणी करण्यात यावी. जैव सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र पथक पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. कुक्कुट पक्षी, अंडी आदींचे सर्वेक्षण झाल्यावर         नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले.सिंह यांनी पोल्ट्रीमधील कुक्कुट पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याच्या कामाची पाहणी केली. विल्हेवाट लावताना सर्व मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन करावे आणि अधिकाऱ्यांनी सदर प्रक्रीयेकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी पोल्ट्री व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बर्ड फ्लूबाबत परिसरात गैरसमज पसरू नये याबाबत दक्षता घ्यावी. रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक सतर्कता बाळगावी. पोल्ट्रीमध्ये कुक्कुट पक्ष्यांची मरतूक आढल्यास तेथील नमुने त्वरीत प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवावे. कत्तल कामी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र पथक नेमावे, असे निर्देश त्यांनी दिले. नगरपालिका हद्दीत दवंडी देऊन खबरदारीविषयक नागरिकांना माहिती द्यावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महेश सुधाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, उप शिक्षणाधिकारी युनुस पठाण आणि पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.नवापूर येथे निगराणी क्षेत्रातील एकूण २७ पोल्ट्री फार्ममध्ये १० लाख चार हजार १४० पक्ष्यांची गणना झाली असून त्यापैकी ३२ हजार ८९१ मरतूक आढळले आहे. यापैकी बाधित क्षेत्रात १६ पोल्ट्रीमधील चार लाख ९० हजार ४८५ कुक्कुट पक्षी आहेत.           पहिल्या टप्प्यात नमुने पॉझिटीव्ह आलेल्या चार पोल्ट्री फार्ममधील साधारण एक लाख २६ हजार पक्ष्यांच्या कत्तलीचे काम पशुसंवर्धन विभागामार्फत सकाळी सुरू करण्यात आले. दरम्यान सायंकाळपर्यंत ३० हजार पक्ष्यांची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.सर्व प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कत्तल करण्याच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देण्यात  आले आहे. त्यांच्या निवासस्थानी व पोर्ल्टी फार्मच्या ठिकाणी आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.