शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

अक्षय्य तृतीया आली तरी सालगडी मिळेना, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ ...

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ आला की शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला ठेवावे याचा विचार करू लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी साल गड्याला वार्षीक रक्कम ३५ ते ५५ हजारांपर्यंत सहज दिले गेले होते. यावर्षी अवकाळी पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता आखाजीचा सण जवळ येऊन ठेपला आहे तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. सालगडी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बटाईने, भाडेतत्त्वावर शेती करण्याच्या मानसिकतेत आहेत. प्रथेप्रमाणे शेतकरी आखाजीच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून सालगडी निवडतात पूर्वीचा सालगडी योग्य वाटल्यास त्याच्या वार्षिक रकमेत काही प्रमाणात वाढ करून त्यालाच पुन्हा ठेवले जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहीर व बोअरला काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे, तर काही कोरड्या ठक्क झाल्या आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न कमी निघाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सालगडी वर्षाची अदाईगी ५० ते ७० हजार व चार पोते धान्य मागत आहे. दिवसभर शेतात काम करणार, पण रात्री शेतात मुक्कामी राहणार नाही, मालकांनी मोबाइलची सोय करून द्यावी, ठरलेल्या रकमेची निम्मी रक्कम उचल म्हणून सुरुवातीलाच द्यावी, अशा मागण्या सालगडी मांडत आहेत. शेती अवजारे खते बी-बियाणे यांचे दर वाढत आहे अशा परिस्थितीत मोठा बागायतदार किंवा मोठे शेतकरी यांनाही सालदार लावून घेण्याचे अडचणीचे ठरत आहे, तर अल्पभूधारक निम्मेबटाई किंवा पैशाने शेती देण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी यावर उपाय म्हणून हंगामी रखवालदार किंवा गडी निवडतात, त्यातही ज्यांना ट्रॅक्टर चालवीने येते त्यांना शेतकरी प्राध्यान्याने निवडले जाते.

यंदा असलेली लॉकडाऊन, संचारबंदी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली महागाई यामुळे यंदा शेतीतून अत्यंत कमी उत्पादन निघाले आहे. निघालेल्या मालास बाजारपेठेत भाव मिळाला नाही. बँका कर्जवाटपात दिरंगाई करतात, काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळाला नाही, त्यामुळे सालदाराचा पगार व चार पोती धान्य द्यावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अर्जुन चौधरी, शेतकरी, बामखेडा