शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अक्षय्य तृतीया आली तरी सालगडी मिळेना, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ ...

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकट, पावसावर अवलंबून असलेला शेती व्यवसाय संकटात सापडलेला आहे. अक्षय्य तृतीया सण जवळ आला की शेतकरी शेतीकामासाठी सालगडी म्हणून नोकरीस कोणाला ठेवावे याचा विचार करू लागतो व त्यानुसार सालगडी शोधत असतो. मागील वर्षी साल गड्याला वार्षीक रक्कम ३५ ते ५५ हजारांपर्यंत सहज दिले गेले होते. यावर्षी अवकाळी पाऊस कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता आखाजीचा सण जवळ येऊन ठेपला आहे तरीही शेतकरी सालदार ठेवण्याची हिंमत दाखवत नसल्याचे चित्र दिसत आहे. सालगडी मिळत नसल्यामुळे काही शेतकरी बटाईने, भाडेतत्त्वावर शेती करण्याच्या मानसिकतेत आहेत. प्रथेप्रमाणे शेतकरी आखाजीच्या दोन-तीन दिवस अगोदरपासून सालगडी निवडतात पूर्वीचा सालगडी योग्य वाटल्यास त्याच्या वार्षिक रकमेत काही प्रमाणात वाढ करून त्यालाच पुन्हा ठेवले जाते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने विहीर व बोअरला काही ठिकाणी पाणी कमी झाले आहे, तर काही कोरड्या ठक्क झाल्या आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न कमी निघाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत सालगडी वर्षाची अदाईगी ५० ते ७० हजार व चार पोते धान्य मागत आहे. दिवसभर शेतात काम करणार, पण रात्री शेतात मुक्कामी राहणार नाही, मालकांनी मोबाइलची सोय करून द्यावी, ठरलेल्या रकमेची निम्मी रक्कम उचल म्हणून सुरुवातीलाच द्यावी, अशा मागण्या सालगडी मांडत आहेत. शेती अवजारे खते बी-बियाणे यांचे दर वाढत आहे अशा परिस्थितीत मोठा बागायतदार किंवा मोठे शेतकरी यांनाही सालदार लावून घेण्याचे अडचणीचे ठरत आहे, तर अल्पभूधारक निम्मेबटाई किंवा पैशाने शेती देण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकरी यावर उपाय म्हणून हंगामी रखवालदार किंवा गडी निवडतात, त्यातही ज्यांना ट्रॅक्टर चालवीने येते त्यांना शेतकरी प्राध्यान्याने निवडले जाते.

यंदा असलेली लॉकडाऊन, संचारबंदी, कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि दुसरीकडे वाढत चाललेली महागाई यामुळे यंदा शेतीतून अत्यंत कमी उत्पादन निघाले आहे. निघालेल्या मालास बाजारपेठेत भाव मिळाला नाही. बँका कर्जवाटपात दिरंगाई करतात, काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा ही मिळाला नाही, त्यामुळे सालदाराचा पगार व चार पोती धान्य द्यावा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-अर्जुन चौधरी, शेतकरी, बामखेडा