शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

म्हसर्डी धरणाची दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : लोंढरे, ता.शहादा येथील म्हैस नदीवर म्हसर्डी धरण असून, या धरणातील पाणी आता संपुष्टात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : लोंढरे, ता.शहादा येथील म्हैस नदीवर म्हसर्डी धरण असून, या धरणातील पाणी आता संपुष्टात आले आहे. धरणातील गाळ पावसाळ्यापूर्वी काढणे गरजेचे असून, धरणाची संरक्षण भिंत ही धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या संरक्षण भिंतीचे काम त्वरित करण्यात यावे अन्यथा पावसाळ्यात धरण शंभर टक्के भरून अनुचित प्रकार घडल्यास परिसरातील आठ ते दहा गावांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.लोंढरे गावाच्या पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर म्हैस नदीवर म्हसर्डी धरण आहे. गेल्या वर्षी झालेल्या पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरून संरक्षण भिंती वरून पाणी वाहत होते. या संरक्षण भिंतीला ठिक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातूनदेखील पाण्याच्या प्रवाह सुरू होता. या धरणातील जलसाठ्यामुळे लगतच्या आठ ते दहा खेड्यातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली येवून गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील दूर होतो. सध्य:स्थितीत धरणात पाणी नसल्याने या धरणाच्या दुरूस्तीचे काम त्वरीत करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या तीन वर्षापासून धरणाच्या मुख्य बांधाच्या भिंतीतून सातत्याने गळती सुरू असून, त्यात हळूहळू प्रमाण वाढत गेले आहे. याबाबत अधिकाऱ्यांंकडे दरवर्षी लेखी तक्रार केली जाते. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. लेखी निवेदन देऊन त्याचा उपयोग होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सद्य:स्थितीत धरणाच्या मुख्य बांधाच्या भिंतीतून पाणी गळत असल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पावसाळ्यात धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच ज्या भागाकडून सांडवा काढण्यात आलेला आहे त्या सांडव्याची भिंतदेखील निकृष्ट दर्जाची असून, या भिंतीचे नुकसान झाल्यास पाच ते सहा गावांना नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील सर्वच लहान-मोठे धरण काठोकाठ भरलेले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून या धरणाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यंदा हवामान खात्यातर्फे पावसाचे प्रमाण अधिक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आहे. अतिवृष्टी झाल्यास धरणात पाण्याचा अतिरिक्त दाब तयार झाल्यास भिंत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लघुसिंचन विभागातील अधिकाºयांनी तत्काळ लोंढरे धरणाची पाहणी करून मुख्य बांधाची भिंत व दगडाची पिचिंगचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अशी मागणी आहे.गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने धरणाला गळती लागत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी धरणाच्या दुरूस्तीचे काम काढल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्विकारतील त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अगोदर धरणासची पाहणी करून संबंधित अधिकाºयांना सूचना द्याव्यात. तसेच धरणाची कायमची गळती थांबवून शेतकºयांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशीही मागणी ईश्वर माळी, उपसरपंच हिंमत रोकडे, मनोज रोकडे, राकेश माळी, धांद्रे येथील उपसरपंच चतुर पाटील यांनी केली आहे.याकडे लघु सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दखल घेऊन धरणाची दुरूस्ती करावी अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले परिषदचे कार्यकर्ते ईश्वर माळी यांनी केली आहे.