शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे ...

पावसाळा अगदी तोडांवर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आपापल्या राहत्या घरी गुरांसाठी लागणारा चारा साठवण्याचा वाडा, गुरांचे गोठे, व शेतीमाल साठवण करण्याची मोठी गोदामे तसेच मातीच्या घरांचे छत, धाबे दुरुस्त करण्याच्या कामाला वेग दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद आहेत. त्यात काही वेळ सूट मिळत असून, बाजारपेठ सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू उपलब्ध होत असल्यामुळे कामाला गती आली आहे.

तालुक्यातील डोंगरगाव, सावखेडा, शेल्टी आदी शिवारातून पूर्वी बैल गाडीवरून मोठ्या कष्टाने खारी माती आणली जायची. मात्र आता ट्रॅक्टरने महाग खारी माती आणून धाब्यांवर टाकली जाते. सध्या खारी मातीसाठी मोठी किंमत मोजावी लागते. पूर्वी पावसाळ्याच्या दीड ते दोन महिना आधीपासून खारी माती लांबून आणून अंगणात टाकली जायची. त्यानंतर मित्र मंडळीतील ८ ते १० व्यक्तींना बोलवून त्यांच्या मदतीने प्रेमाच्या भावनेपोटी खारी माती धाब्यांवर मोफत चढवून पसरविली जायची. त्यानिमित्ताने मित्र मंडळी एकत्र येत छोटेखानी चहा, नास्त्याचा कार्यक्रमदेखील होत असे. मात्र हे चित्र आता ग्रामीण भागात बदललेले दिसून येते. याच कामासाठी आता पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.

खारी माती महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक कागद पूर्ण धाब्यांवर अंथरण्यात येत आहे. त्यासाठी धाबे कोरून कागद अंथरल्यावर माती टाकली जाते. या कामासाठी मजुरी द्यावी लागते.

तालुक्यातील शोभानगर, वडछील पुनर्वसन, राणीपूर, पिंप्राणी आदी आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये पावसाळ्यात घर गळू नये म्हणून कौलांच्या दुरुस्तीची कामे असून, घरांची बांधणी करण्यात येत आहे. कुटुंबासह आदिवासी बांधव घरांची बांधणी करतानाचे चित्र दिसून येत आहे. तसेच पावसाळ्यात सरपणाची कमतरता भासू नये म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने शेतातील कापसाच्या काड्या घराभोवती साठवण्यात येत आहेत. तसेच गुरांसाठी लागणारा सुका चाऱ्याची साठवणूक सुरू आहे. पावसाळ्यात शेतात असलेला गुरांसाठीचा चारा ओला होऊ नये म्हणून शेतकऱ्यांकडून शेडमध्ये चाऱ्याची साठवणूक करण्यात येत आहे.