शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

नंदुरबार जिल्ह्यात मुबलक वाळू, परंतु गुजरातवर सर्व भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू ठेके रखडले आहेत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. पैकी दोन घाटांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू ठेके रखडले आहेत. यंदा तीन घाट निश्चित करण्यात आले. पैकी दोन घाटांचा लिलाव करण्यात आला. एकाचे पैसे भरून ते परत घेण्याची वेळ आली तर दुसरा घाटचा लिलाव झाला परंतु पैसेच भरले गेले नाहीत. तिसरा लिलाव कुणीच घेतला नाही. दरम्यान, जिल्ह्यातून गुजरातमधील वाळूची दररोज तब्बल दीडशे वाहने पास होत असल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.

जिल्ह्यात तापी, गोमाई, रंगावली या नदींमध्ये एकुण ३१ वाळू घाट आहेत. त्यातील अनेक घाट हे पर्यावरण मुल्यांकनात अडकले होते. तापीनदीवरील कुढावद तर्फे सारंगखेडा, कौठळ व टेंभा या गाव शिवारातील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रीया करण्यात आली. त्यातील कौठळचा घाट हा दोन कोटी ९७ लाखात गेला. त्याचे पैसेही भरण्यात आले. परंतु घाटात पाणी असल्याचे कारण सांगून वाळू उपसा करण्यास परवाणगी देण्यात आली नाही, अखेर ठेकेदाराने पैसे परत घेतले. दुसरा टेंभा घाटाचा लिलाव तीन कोटीत झाला. परंतु ठेकेदाराने पैसेच भरले नाहीत. तिसऱ्या कुढावद घाटासाठी कुणीच निविदा भरली नाही.

दुसरीकडे जिल्ह्याच्या सिमेवरील गुजरातच्या हद्दीतून तापीमध्ये चार ते पाच ठेके आहेत. त्यातून लाखो ब्रास वाळू उपसा होत असून त्याची वाहतूक जिल्ह्यातून बिनधिक्कत सुरू आहे. दररोज किमान दीडशे वाहने जिल्ह्यातून नाशिक, मुंबई, औरंगाबाद या भागात जातात.

वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे गेल्या वर्षभरात १० ते पेक्षा अधीक अपघात झाले असून त्यात तीन जणांना जीव गमवावा लागला तर १५ पेक्षा अधीक जण जायबंदी झाले आहेत. प्रशासनाने वर्षभरात १७० वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे.

दरम्यान, खनिकर्म विभागाच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी चव्हाण यांनी सांगितले, जिल्ह्यात तीन वाळू घाटांचा लिलाव प्रक्रीया राबविण्यात आली. परंतु तांत्रीक कारणांनी ते घाट सुरू होऊ शकले नसल्याचे स्पष्ट केले.