शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

सुसरी धरणात ८२ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा दिवसागणिक वाढत आहे. काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास या धरणात १०० टक्के पाणीसाठा होणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान धरणातील दोन खिडक्या उघडून पाण्याचा विसर्ग गोमाई नदीत सोडण्यात आला. याचसोबत सांडवा नाल्यातून पाणी वाहत असल्याने शेतकरी सुखावला आहे.जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परिसरात पावसाने चांगली दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र १५ ते २० दिवस पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत झाला होता. उन्हाचा तडाखा सुरू झाल्यामुळे नागरिक, जनावरे लाहीलाही झाले होते. पुन्हा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन पिकांनाही फायदा झाला. आता गेल्या १५ दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशात उगम पावलेल्या सुसरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणात सद्यस्थितीत पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील पाणी गोमाई नदीपात्रात सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सुसरी धरणामुळे नवलपूर, अवगे-जुनवणे, मोहिदा, कलसाडी, पाडळदा, तिखोरा, पिंगाणे यासह सुमारे १५ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी लाभ होतो.दरम्यान, धरणात पाणीसाठा करण्याची जेवढी क्षमता आहे तेवढा पाणीसाठा होऊ द्यावा. कारण पावसाळ्याच्या शिल्लक दिवसात पाऊस झाला नाही तर धरणात असलेले पाणी वाहून वाया जाण्याची शक्यता आहे. हे पाणी वाहून गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बागायती शेती करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.