शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

सुसरी धरणात ८२ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा दिवसागणिक वाढत आहे. काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास या धरणात १०० टक्के पाणीसाठा होणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान धरणातील दोन खिडक्या उघडून पाण्याचा विसर्ग गोमाई नदीत सोडण्यात आला. याचसोबत सांडवा नाल्यातून पाणी वाहत असल्याने शेतकरी सुखावला आहे.जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परिसरात पावसाने चांगली दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र १५ ते २० दिवस पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत झाला होता. उन्हाचा तडाखा सुरू झाल्यामुळे नागरिक, जनावरे लाहीलाही झाले होते. पुन्हा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन पिकांनाही फायदा झाला. आता गेल्या १५ दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशात उगम पावलेल्या सुसरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणात सद्यस्थितीत पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील पाणी गोमाई नदीपात्रात सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सुसरी धरणामुळे नवलपूर, अवगे-जुनवणे, मोहिदा, कलसाडी, पाडळदा, तिखोरा, पिंगाणे यासह सुमारे १५ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी लाभ होतो.दरम्यान, धरणात पाणीसाठा करण्याची जेवढी क्षमता आहे तेवढा पाणीसाठा होऊ द्यावा. कारण पावसाळ्याच्या शिल्लक दिवसात पाऊस झाला नाही तर धरणात असलेले पाणी वाहून वाया जाण्याची शक्यता आहे. हे पाणी वाहून गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बागायती शेती करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.