शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

सुसरी धरणात ८२ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या १५ दिवसापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सुसरी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा साठा दिवसागणिक वाढत आहे. काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास या धरणात १०० टक्के पाणीसाठा होणार आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान धरणातील दोन खिडक्या उघडून पाण्याचा विसर्ग गोमाई नदीत सोडण्यात आला. याचसोबत सांडवा नाल्यातून पाणी वाहत असल्याने शेतकरी सुखावला आहे.जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात परिसरात पावसाने चांगली दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र १५ ते २० दिवस पावसाने ताण दिल्याने शेतकरी चिंतेत झाला होता. उन्हाचा तडाखा सुरू झाल्यामुळे नागरिक, जनावरे लाहीलाही झाले होते. पुन्हा पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन पिकांनाही फायदा झाला. आता गेल्या १५ दिवसांपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेशात उगम पावलेल्या सुसरी नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणात सद्यस्थितीत पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील पाणी गोमाई नदीपात्रात सोडण्यात येते. या धरणामुळे परिसरातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सुसरी धरणामुळे नवलपूर, अवगे-जुनवणे, मोहिदा, कलसाडी, पाडळदा, तिखोरा, पिंगाणे यासह सुमारे १५ गावातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी लाभ होतो.दरम्यान, धरणात पाणीसाठा करण्याची जेवढी क्षमता आहे तेवढा पाणीसाठा होऊ द्यावा. कारण पावसाळ्याच्या शिल्लक दिवसात पाऊस झाला नाही तर धरणात असलेले पाणी वाहून वाया जाण्याची शक्यता आहे. हे पाणी वाहून गेल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बागायती शेती करण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने धरणातील पाणी सोडताना काळजी घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त होत आहेत.