शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा आगारातील ६८ कर्मचारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : ़अक्कलकुवा आगारातील चालक, वाहक व इतर तांत्रिक अशा ६८ कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : ़अक्कलकुवा आगारातील चालक, वाहक व इतर तांत्रिक अशा ६८ कर्मचाऱ्यांना आगार प्रमुखांनी वरिष्ठांच्या आदेशान्वये २० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. येणाºया काळात अजून अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा जबर फटका बसणार असल्याचे संकेत दिसत असल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या संकटकाळात शासनाने कामगार वर्गाला मदत करण्याऐवजी त्यांचे कंबरडे पूर्णपणे मोडण्याचा सपाटा लावला आहे. याची प्रचिती आता महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाºयांना येऊ लागली आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी व दिवस-रात्रचा विचार न करता अखंडपणे सेवा देणारे कर्मचाºयांना त्याची प्रचिती येऊ लागली आहे. कधी चकाचकीत तर कधी खाचखळग्याच्या रस्त्यावर तर कधी जीवघेण्या घाटात धावणाºया लालपरीने कधी नव्हे ती एवढी विश्रांती चार महिन्याच्या काळात घेतली आहे. या विश्रांतीच्या काळात प्रत्येक दिवसाला सहा लाख एवढे नुकसान होत असल्याचे सांगण्यात येते. परिणामी अक्कलकुवा आगारातील २६ चालक, २६ वाहक व २६ तांत्रिक कर्मचाºयांना मुंबई येथून फतवा काढून २० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चालक व वाहक यांना १२ जुलै ते ३१ जुलैपर्यंत तर २६ तांत्रिक कारागीर व अन्य कर्मचाºयांना १६ जुलैपासून ४ आॅगस्टपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. अक्कलकुवा आगारात ६२ बसेस उपलब्ध असून यासाठी ८६ वाहक व ९६ चालक कार्यरत आहेत. त्यांना मार्च महिन्यात ७५ टक्के, एप्रिल महिन्यात पूर्ण १०० टक्के, मे महिन्यात बेसिकच्या ५० टक्के वेतन अदा करण्यात आले आहे तर जून महिन्याचे वेतन आजपर्यंत जमा झालेले नाही. त्यामुळे या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. वाहक व चालक यांना मंदीच्या काळात २० दिवस तर गरजेनुसार इतर २० दिवस अशा ४० दिवसांच्या रजा वर्षभरात घेता येतात. कर्मचाºयांना ज्यावेळी रजेची गरज असताना त्यांना अधिकाºयांची विनवणी करावी लागत असते. आता कर्मचाºयांना रजेची गरज नसतानाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजी पसरत आहे. आधीच मे महिन्याच्या वेतन सरसरीत ५० टक्के कर्मचाºयांना झळ बसलेली आहे.