शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

९० दिवसांत ५२ बालके दगावली, ४०९ तीव्र कुपोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 09:26 IST

४०९ तीव्र कुपोषित, आहारासाठी खटाटोप

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (जि. अमरावती) : कुपोषणाने ग्रासलेल्या मेळघाटात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल ५२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मृतांमध्ये उपजत १७ आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३५ बालकांचा समावेश आहे. तीव्र कुपोषणाने ४०९ बालके पीडित आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यांतील या बालकांना वाचविण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमधून अमायलेजयुक्त पोषण आहार देण्याचा खटाटोप सुरू आहे. देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी आदिवासी भागा हे वास्तव पुढे यावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते.

धारणी व चिखलदरा तालुक्यांत न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाच्या विविध योजना कार्यान्वित आहेत. बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत दोन्ही तालुक्यांत ४२५ पेक्षा अधिक अंगणवाडी केंद्रांतून स्तनदा, गर्भवती माता व शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पौष्टिक आहार शिजवून दिला जातो. जलजन्य आजाराची लागण होऊन कमी होणारे वजन आणि विविध आजारांनी मृत्यू पाहता मेळघाटातील बालकांची पावसाळ्यात अत्यंत जोखीम असते. धारणी व चिखलदरा तालुक्यांत कुपोषणाच्या तीव्र श्रेणीतील सॅममध्ये एप्रिल, मे  महिन्यांत २१३ बालकांचा समावेश होता. जून महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ४०९ झाला आहे. तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ३७५६ बालकांसाठी १ ते ३० जुलैदरम्यान पेसा कायद्यांतर्गत व्हीसीडीसी उघडण्यात आले आहे.

उपजत १७ बालके दगावली

सर्वसाधारण श्रेणीत ३२,५७६ व मॅममध्ये ३,३४७ बालके आहेत. ३,८२० गरोदर व ३,४१० स्तनदा माता आहेत. 

तीन महिन्यांत उपजत आणि शून्य ते सहा वयोगटातील ५२ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा १५ ने हा आकडा कमी आहे. पावसाळ्याचे दिवस पाहता आरोग्य सुविधा, आहार पुरविला जात आहे.- दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर