शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

जिल्ह्यातील २४ हजार नागरिकांनी केला कोरोनाचा यशस्वीपणे पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर कमी अधिक प्रमाणात संसर्ग बाधित रुग्ण समोर येण्याचे ...

नंदुरबार : एप्रिल २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा प्रथम रुग्ण आढळून आल्यानंतर कमी अधिक प्रमाणात संसर्ग बाधित रुग्ण समोर येण्याचे प्रमाण होते. परंतु मार्च २०२१ मध्ये रुग्ण वाढीच्या संख्येने हजारोंच्या संख्येत प्रवेश केल्याने चिंता वाढल्या होत्या. परंतु या चिंतांमध्ये दिलासा देणारी बाबही समोर आली असून गेल्या एक वर्षात तब्बल २४ हजार नागरीकांनी कोरोनाचा यशस्वीपणे सामना करत त्याचा पराभव करुन आरोग्य अबाधित राखले आहे.

या २४ हजार नागरिकांच्या अनुभवातूनच सध्या उपचार घेत असलेल्या अनेकांना आधार मिळत असल्याचेही दिसून येत आहे. फोफावणारा संसर्ग कमी व्हावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार कामी येत आहेत. यातूनच अनेकांनी कोरोनावर मात करत घरचा रस्ता धरला आहे. सध्या जिल्ह्यात साडेसात हजार रुग्ण असले तरी गेल्या आठ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने रुग्ण संख्या घटत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन बाधितांच्या संख्येवरही नियंत्रण शक्य होणार आहे.

जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेटही झाला कमी

जिल्ह्यात आजअखेरीस एकूण ६ हजार ९५७ रुग्ण आहेत. यातून जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट हा २२ टक्के आहे. शंभरातील २२ नागरिकांना सध्या कोरोनाची लागण असू शकते असा याचा अर्थ असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. गेल्या १० दिवसात या आकडेवारीत ९ टक्क्यांची घट आली असल्याची माहिती आहे. येत्या काळात हा दर आणखी घसरणार असल्याचे खात्रीशीरपणे सांगण्यात येत आहे.

सीटीस्कॅनचा स्कोर हा सहा होता. यातून भीतीही बरीच होती. परंतु केवळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आणि आहार यावर लक्ष केंद्रित केले. सकारात्मक विचार ठेवत दिनचर्या सुरू ठेवली. मनात भीतीही ठेवली नाही अन् मुक्त झालो.

-कोरोनामुक्त,

६९ वर्ष, शहादा.

ग्रामीण भागात कोरोनाबद्दल बरेच गैरसमज आहेत. दवाखान्यात जाऊच नये, असा सल्ला सर्वात प्रथम दिला गेला. परंतु योग्य उपचारांशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे ठाऊक होते. त्यानुसार रुग्णालयात दाखल झालो.

-कोरोनामुक्त,

७२ वर्षीय पुरुष, घोटाणे, ता. नंदुरबार.

कोरोनामुक्त होणे ही खरी तर कसोटी आहे. सकारात्मक ऊर्जा आणि विचार यातून कोरोना बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनावर उपचार घेतले पाहिजेत. उपचार घेणे हाच एकमेव पर्याय यावर उपलब्ध आहे.

-कोरोनामुक्त,

६५ वर्षीय महिला,नंदुरबार.

कोरोनाची लागण झाली ही भीतीच रोग बळावण्याचे मुख्य कारण बनत आहे. पाॅझिटिव्ह असलेल्या या आजाराला पाॅझिटिव्ह राहून संपवणे, हीच मोठी उमेद आहे. जिल्हा रुग्णालयात आम्ही दररोज रुग्णांना यावर मार्गदर्शन करतो.

-डाॅ. के. डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.