नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आली आहे. गुरुवारी पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच ५एन ८ या विषाणूबाधित आले आहे. यामुळे नवापूर शहरातील आतापर्यंत २० पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उर्वरित सात पोल्ट्रीतील अहवाल पाठवण्यात आले आहे. सर्व पोल्ट्रीतील कुकुट पक्षी व अंडी नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.
दररोज अहवाल पॅाझिटिव्ह येत असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी सहा पोल्ट्री फार्ममध्ये किलिंग ऑपरेशन दिवसभरामध्ये राबविण्यात आले.
यात मुस्तफा पोल्ट्रीत सात हजार ६०९, सफा पोल्ट्री ६ हजार ७७, न्यू शांती पोल्ट्री नऊ हजार ९२७, जस पोल्ट्रीत ५ हजार ३९८ शाहीन पोल्ट्री १६ हजार २१९, एफसन्स पोल्ट्री ६ हजार ११ असे एकूण सहा पोल्ट्रीत दिवसभरात ५१ हजार २४१ पक्षी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत २७ पोल्ट्रीमधून १६ पोल्ट्रीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
१६ पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ४५४ पक्षी नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.
गुरुवारी २७ पोल्ट्रीमधील सर्व अंडीचे मोजमाप व पंचनामा करून अंडी नष्ट केली. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील श्रेयस पोल्ट्री, २३ हजार ६९५ अंडी मुस्तुफा पोल्ट्री-(पिंपळनेर रोड ) २ लाख ३७ हजार, मुस्तुफा (लहान चिंचपाडा)००, परवेज पोल्ट्री २७ हजार ८१०, सफा पोल्ट्री २६ हजार ७७०,शाईन पोल्ट्री ४८ हजार ७००,डायमंड पोल्ट्री ६ लाख १७ हजार ८२०, न्यू डायमंड ३३ हजार ३९० एकूण ९ लाख ८१ हजार ८८५ अंडी नाश करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील न्यू शांती पोल्ट्री ७२ हजार १२०,जस पोल्ट्री ९३ हजार ५१०,शिश पोल्ट्री ७४ हजार ६१०,सहयोग पोल्ट्री २ लाख ७२ हजार ५००, एप्सन पोल्ट्री ३२ हजार ३४०,वासिम पोल्ट्री १ लाख २६ हजर ९६०,पालावाला पोल्ट्री २ लाख ६९ हजार ९७०, आमलीवाला पोल्ट्री १३ हजार ९५० असे एकूण आठ पोल्ट्रीतील ८ लाख ९५ हजार ९६० अंडी नष्ट करण्यात आली.
दिवसभरात ९५ पथकाने १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करून खड्ड्यात पुरवण्यात आली आहे. उर्वरित ११ पोल्ट्रीतील अंडी अहवाल आल्यानंतर टप्प्या टप्प्याने नाश करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली आहे.