शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

नवापुरात १८ लाख अंडी केली नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:30 IST

नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत ...

नवापूर : परिसरामध्ये पाचव्या दिवशी ६ पोल्ट्रीतील ५१ हजार कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहे. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नाश करण्यात आली आहे. गुरुवारी पुन्हा चार अहवाल बर्ड फ्लू एच ५एन ८ या विषाणूबाधित आले आहे. यामुळे नवापूर शहरातील आतापर्यंत २० पोल्ट्रीतील अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उर्वरित सात पोल्ट्रीतील अहवाल पाठवण्यात आले आहे. सर्व पोल्ट्रीतील कुकुट पक्षी व अंडी नष्ट करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

दररोज अहवाल पॅाझिटिव्ह येत असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. गुरुवारी सहा पोल्ट्री फार्ममध्ये किलिंग ऑपरेशन दिवसभरामध्ये राबविण्यात आले.

यात मुस्तफा पोल्ट्रीत सात हजार ६०९, सफा पोल्ट्री ६ हजार ७७, न्यू शांती पोल्ट्री नऊ हजार ९२७, जस पोल्ट्रीत ५ हजार ३९८ शाहीन पोल्ट्री १६ हजार २१९, एफसन्स पोल्ट्री ६ हजार ११ असे एकूण सहा पोल्ट्रीत दिवसभरात ५१ हजार २४१ पक्षी नष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत २७ पोल्ट्रीमधून १६ पोल्ट्रीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

१६ पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लाख ७९ हजार ४५४ पक्षी नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.

गुरुवारी २७ पोल्ट्रीमधील सर्व अंडीचे मोजमाप व पंचनामा करून अंडी नष्ट केली. १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीत दोन टप्प्यात १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील श्रेयस पोल्ट्री, २३ हजार ६९५ अंडी मुस्तुफा पोल्ट्री-(पिंपळनेर रोड ) २ लाख ३७ हजार, मुस्तुफा (लहान चिंचपाडा)००, परवेज पोल्ट्री २७ हजार ८१०, सफा पोल्ट्री २६ हजार ७७०,शाईन पोल्ट्री ४८ हजार ७००,डायमंड पोल्ट्री ६ लाख १७ हजार ८२०, न्यू डायमंड ३३ हजार ३९० एकूण ९ लाख ८१ हजार ८८५ अंडी नाश करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील न्यू शांती पोल्ट्री ७२ हजार १२०,जस पोल्ट्री ९३ हजार ५१०,शिश पोल्ट्री ७४ हजार ६१०,सहयोग पोल्ट्री २ लाख ७२ हजार ५००, एप्सन पोल्ट्री ३२ हजार ३४०,वासिम पोल्ट्री १ लाख २६ हजर ९६०,पालावाला पोल्ट्री २ लाख ६९ हजार ९७०, आमलीवाला पोल्ट्री १३ हजार ९५० असे एकूण आठ पोल्ट्रीतील ८ लाख ९५ हजार ९६० अंडी नष्ट करण्यात आली.

दिवसभरात ९५ पथकाने १६ बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्रीतील १८ लाख ७७ हजार ८४५ अंडी नष्ट करून खड्ड्यात पुरवण्यात आली आहे. उर्वरित ११ पोल्ट्रीतील अंडी अहवाल आल्यानंतर टप्प्या टप्प्याने नाश करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली आहे.